शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बुलडाणा जिल्ह्यातील १६ प्रकल्पांना बाष्पीभवन मापक यंत्रांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 11:01 IST

Buldhana News : १६ प्रकल्पांवर बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्याचे पाच वर्षापूर्वी निर्देश देण्यात आले होते.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून एक हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचनक्षमता असलेल्या १६ प्रकल्पांवर बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्याचे पाच वर्षापूर्वी निर्देश देण्यात आले होते. मात्र पाच वर्षानंतरही त्यासंदर्भातील अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जवळपास ३० टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे १५ वर्षापूर्वी करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले होते.त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील १६ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांवर हे यंत्र बसविण्यासंदर्भात २०१७ मध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र अद्यापही त्या पूर्णत्वास गेलेल्या नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेकडे (मेरी) निधीही जमा करण्यात आलेला आहे. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झालेली नाही. मेरीच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे बाष्पीभवन मापक यंत्र प्रकल्पांवर लावण्यात येणार आहेत. हवामानातील बदल, वाढते उष्णातामान आणि अपघाव पद्धतीने पडणारा पाऊस पाहता पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन व्हावे या दृष्टिकोनातून या हालचाली सुरू झाल्या होत्या. राज्य शासनाने यासंदर्भात विदर्भ पाटबंधारे विकास मंडळालाही त्यावेळी पत्र पाठवले होते. पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पावर या सुविधा आहेत. मात्र आपल्याकडे त्या नाहीत, असे सुत्रांनी  स्पष्ट केले. यंदाच्या पावसाळ्यातील दोन महिन्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. 

या प्रकल्पांचा होता समावेशजिल्ह्यातील नळगंगा, ज्ञानगंगा, कोराडी, पलढग, मस, मन, तोरणा, उतावळी, मांडवा, व्याघ्रा नाला, बोरखेडी, डोरपगाव, मासरूळ, विद्रूपा, करडी, ब्राम्हणवाडा या प्रकल्पावर हे यंत्र बसविण्यात येणार होते. नळगंगा प्रकल्पावर पूर्वी ते बसविण्यात आले होते. मात्र ते नादुरुस्त झाल्याने त्याचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता. प्रकल्पांच्या भिंतीलगत, मोकळ्या जागेत जेथे उपद्रव होणार नाही अशा ठिकाणी सावलीत हे यंत्र लावण्यात येणार होते.

पाणीवापराचा अचूक अंदाज मिळेलया यंत्रामुळे प्रकल्पातील जलसाठ्यापैकी प्रत्यक्षात किती पाण्याचे बाष्पीभवन होते याचे मोजदाद होऊन जलसाठ्याचे पिण्याच्या पाण्यासाठी, शेती सिंचनासाठी नियोजन करणे सोपे जाईल. जलसाठ्यातील जवळपास ३० टक्के पाण्याचे साधारणत: बाष्पीभवन होते. अलिकडील काळात वाढलेले तापमान पाहता हे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  १५ वर्षापूर्वी याबाबत अभ्यास करण्यात आला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प