शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

By सदानंद सिरसाट | Updated: July 22, 2023 20:53 IST

संग्रामपूर : काथरगाव पिंप्री येथे लेंडी व पांडव नदीचा संगम आहे. त्यामुळे येथील नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. नदीकाठावरील ...

संग्रामपूर : काथरगाव पिंप्री येथे लेंडी व पांडव नदीचा संगम आहे. त्यामुळे येथील नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. नदीकाठावरील ३० घरांच्या वस्तीला पुराने वेढा घातल्याने सुमारे १५० नागरिक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले. पथक दाखल होण्यापूर्वी पुराचे पाणी ओसरल्याने ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

पथकाने अपंग, विकलांग, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढले. बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांना समाजमंदिर, मारोती मंदिर, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले. या ठिकाणीच राहणे व खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांवर उपचार करण्यासाठी एक वैद्यकीय पथक गावात दाखल झाले. या वस्तीच्या एका बाजूला नदी तर दुसऱ्या बाजूला नाला असल्याने पूर्ण वस्तीला पुराचा फटका बसला आहे. वस्तीतील नागरिकांनी एका घराच्या छतावर आश्रय घेतला. मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने काथरगाव पिंप्री गाव जलमय झाले. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

काथरगाव पिंप्री येथे पुरात अडकलेल्या १५० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.- योगेश्वर टोंपे, तहसीलदार, संग्रामपूर 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस