शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

By सदानंद सिरसाट | Updated: July 22, 2023 20:53 IST

संग्रामपूर : काथरगाव पिंप्री येथे लेंडी व पांडव नदीचा संगम आहे. त्यामुळे येथील नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. नदीकाठावरील ...

संग्रामपूर : काथरगाव पिंप्री येथे लेंडी व पांडव नदीचा संगम आहे. त्यामुळे येथील नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. नदीकाठावरील ३० घरांच्या वस्तीला पुराने वेढा घातल्याने सुमारे १५० नागरिक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले. पथक दाखल होण्यापूर्वी पुराचे पाणी ओसरल्याने ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

पथकाने अपंग, विकलांग, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढले. बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांना समाजमंदिर, मारोती मंदिर, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले. या ठिकाणीच राहणे व खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांवर उपचार करण्यासाठी एक वैद्यकीय पथक गावात दाखल झाले. या वस्तीच्या एका बाजूला नदी तर दुसऱ्या बाजूला नाला असल्याने पूर्ण वस्तीला पुराचा फटका बसला आहे. वस्तीतील नागरिकांनी एका घराच्या छतावर आश्रय घेतला. मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने काथरगाव पिंप्री गाव जलमय झाले. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

काथरगाव पिंप्री येथे पुरात अडकलेल्या १५० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.- योगेश्वर टोंपे, तहसीलदार, संग्रामपूर 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस