शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१४१ गाव पाणीपुरवठा योजना फायद्याची

By admin | Updated: May 24, 2014 00:11 IST

जळगाव जामोद तालुक्यातील सुमारे २ हजार एकर शेतीही सिंचनाखाली येणार!

संग्रामपूर : सुमारे २ हजार एकर शेतीही सिंचनाखाली येणार संग्रामपूर: जळगाव जामोद मतदार संघात होऊ घातलेली १४१ गाव पाणीपुरवठा योजना दुहेरी फायद्याची ठरणार आहे. सदर योजना वान धरणावरुन पाणीपुरवठा करणार असल्याने जनतेच्या आरोग्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तर याच योजनेमुळे दोन हजार एकर बागायती क्षेत्र वाढणार आहे. खारपाणपट्याच्या या भागात क्षारयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य खराब होत असतांना बागायतीसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने रब्बीचेही उत्पादन घटलेले, त्यातच पोटाचे आजारामुळे दवाखान्याचा वाढता खर्च पाहता सर्वसामान्य कमालीचे त्रस्त होते. आरोग्यासाठी शुध्द पिण्याचे पाणी महत्वाचे असल्याने वान धरणाच्या जळगाव जा. शहर व १४0 गावांच्या या योजनेमुळे दीड वर्षानंतर गावागावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. पाणी उपलब्धतेनंतर सुरु असलेल्या स्थानिक पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज होणारा उपसा बंद होईल व त्यातून जवळपास दोन हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येवू शकेल. या योजनेंतर्गत ४ लाख २५ हजार लोकांना दररोज ५0 लिटर प्रतिव्यक्ती प्रमाणे जवळपास दोन कोटी दहा लाख लिटर पाणी वान धरणातून मतदार संघातील नागरिकांना मिळणार आहे. ३६५ दिवसाचे हिशोबाने हा आकडा ७७५ कोटी एवढा होतो. म्हणजेच आजच्या घडीला गावागावात पाणीपुरवठा योजनांसाठी दररोजचा विविध साधनातून होणारा उपसा बंद होईल व त्यातून वर्षाचे ७७५ कोटी लिटर पाणी वाचवता येईल. कृषीच्या हिशेबाने प्रती एकराला वर्षभरात तीन पिकांसाठी ४0 लाख लिटर पाण्याची गरज असते. पिण्याच्या पाण्यासाठी होणारा उपसा बंद झाल्यास वाचलेले आठशे कोटी लिटरचे जवळपासचे पाणी शेती सिंचनासाठी कामी येईल.