शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१४१ गाव पाणीपुरवठा योजना फायद्याची

By admin | Updated: May 24, 2014 00:11 IST

जळगाव जामोद तालुक्यातील सुमारे २ हजार एकर शेतीही सिंचनाखाली येणार!

संग्रामपूर : सुमारे २ हजार एकर शेतीही सिंचनाखाली येणार संग्रामपूर: जळगाव जामोद मतदार संघात होऊ घातलेली १४१ गाव पाणीपुरवठा योजना दुहेरी फायद्याची ठरणार आहे. सदर योजना वान धरणावरुन पाणीपुरवठा करणार असल्याने जनतेच्या आरोग्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तर याच योजनेमुळे दोन हजार एकर बागायती क्षेत्र वाढणार आहे. खारपाणपट्याच्या या भागात क्षारयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य खराब होत असतांना बागायतीसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने रब्बीचेही उत्पादन घटलेले, त्यातच पोटाचे आजारामुळे दवाखान्याचा वाढता खर्च पाहता सर्वसामान्य कमालीचे त्रस्त होते. आरोग्यासाठी शुध्द पिण्याचे पाणी महत्वाचे असल्याने वान धरणाच्या जळगाव जा. शहर व १४0 गावांच्या या योजनेमुळे दीड वर्षानंतर गावागावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. पाणी उपलब्धतेनंतर सुरु असलेल्या स्थानिक पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज होणारा उपसा बंद होईल व त्यातून जवळपास दोन हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येवू शकेल. या योजनेंतर्गत ४ लाख २५ हजार लोकांना दररोज ५0 लिटर प्रतिव्यक्ती प्रमाणे जवळपास दोन कोटी दहा लाख लिटर पाणी वान धरणातून मतदार संघातील नागरिकांना मिळणार आहे. ३६५ दिवसाचे हिशोबाने हा आकडा ७७५ कोटी एवढा होतो. म्हणजेच आजच्या घडीला गावागावात पाणीपुरवठा योजनांसाठी दररोजचा विविध साधनातून होणारा उपसा बंद होईल व त्यातून वर्षाचे ७७५ कोटी लिटर पाणी वाचवता येईल. कृषीच्या हिशेबाने प्रती एकराला वर्षभरात तीन पिकांसाठी ४0 लाख लिटर पाण्याची गरज असते. पिण्याच्या पाण्यासाठी होणारा उपसा बंद झाल्यास वाचलेले आठशे कोटी लिटरचे जवळपासचे पाणी शेती सिंचनासाठी कामी येईल.