शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

१४१ गाव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST

वान धरण १४१ गाव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन टाकण्याला शुभारंभ करण्यात आला.

संग्रामपूर : खारपाणपट्टयातील जळगाव जा. आणि संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी वान धरण १४१ गाव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन टाकण्याला शुभारंभ करण्यात आला. यासाठी २0 मे रोजी सोनाळा येथे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ.डॉ.संजय कुटे यांनी ही योजना म्हणजे मतदार संघातील जनतेचे विकासात्मक यश असल्याचे मत व्यक्त केले. या भागात क्षारयुक्त पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात असल्याने गावागावात पोटाचे व किडनीचे आजार वाढल्याने मतदार संघातील जनता आरोग्याबाबत त्रस्त झाली आहे. यासाठी भूगर्भातून शुध्द पिण्याचे पाणी शक्य नसल्याने वान धरणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी वेगळी योजना म्हणून आ.डॉ.संजय कुटे यांनी सर्वांच्या सहकार्यातून शासन दरबारी पाण्याचा मुद्दा प्रखरतेने मांडून शासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली व त्यातून जळगाव जा. शहर व १४0 गाव पाणीपुरवठा योजना उदयास आली. या योजनेतील पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्येच पाण्याच्या टाकीचे बांधकाम उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदारांसोबत सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हा प्रमुख जानराव देशमुख, भाजपाचे राज्य परिषद सदस्य विजय भुतडा, नंदकिशोर अग्रवाल, सरपंचा शकुंतलाबाई गावंडे, जि.प. सदस्या नलिनीताई गावंडे, सभापती जिजाबाई प्रकाश धामोळे, कांचनबाई जयस्वाल, मिनाताई भास्कर, राजवंतीबाई विश्‍वकर्मा, भारत वाघ, जानराव गोरे, प्रमोद गोसावी, निलेश केसाळे, प्रमोद खोद्रे, रमेश खोवले, सोहमआप्पा वडशंकर, श्रीराम दाभाडे, नंदकिशोर विश्‍वकर्मा, रविंद्र दांडगे, मनोज अमानकर, जयराम इंगळे, अशोक मुरूख, श्याम आकोटकार, डॉ.शेख, संजय शिंगणापुरे, तुकाराम काळपांडे, प्रदीप सोळंके, राजेश गोटेचा, राजेश मुयांडे आदिंसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आमदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना आमदारांनी सदर योजनेचे काम चांगल्या रितीने दज्रेदारपणे झाले पाहिजे व लवकरात लवकर जनतेपर्यंत पाणी पोहचले पाहिजे हाच प्रयत्न असणार आहे. मतदार संघाचा विकास करण्यासाठी सर्वसामान्यांचा विश्‍वास जिंकण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करून चांगली माणसे जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणाईचे मने जिंकल्याने मोठय़ा संख्येने यावेळी तरूणांमध्ये जागृती झाली व सत्ता परिवर्तन झाले. आता राज्यासाठीही कामाला लागण्याची वेळ आली आहे. या योजनेत सर्वच गावांचा समावेश आहे. हे सर्व जनतेच्या सहकार्यानेच झाले, असेही सांगितले. संचालन आणि आभार प्रदर्शन डॉ.शेख यांनी केले.