शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

१४१ गाव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST

वान धरण १४१ गाव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन टाकण्याला शुभारंभ करण्यात आला.

संग्रामपूर : खारपाणपट्टयातील जळगाव जा. आणि संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी वान धरण १४१ गाव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन टाकण्याला शुभारंभ करण्यात आला. यासाठी २0 मे रोजी सोनाळा येथे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ.डॉ.संजय कुटे यांनी ही योजना म्हणजे मतदार संघातील जनतेचे विकासात्मक यश असल्याचे मत व्यक्त केले. या भागात क्षारयुक्त पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात असल्याने गावागावात पोटाचे व किडनीचे आजार वाढल्याने मतदार संघातील जनता आरोग्याबाबत त्रस्त झाली आहे. यासाठी भूगर्भातून शुध्द पिण्याचे पाणी शक्य नसल्याने वान धरणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी वेगळी योजना म्हणून आ.डॉ.संजय कुटे यांनी सर्वांच्या सहकार्यातून शासन दरबारी पाण्याचा मुद्दा प्रखरतेने मांडून शासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली व त्यातून जळगाव जा. शहर व १४0 गाव पाणीपुरवठा योजना उदयास आली. या योजनेतील पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्येच पाण्याच्या टाकीचे बांधकाम उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदारांसोबत सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हा प्रमुख जानराव देशमुख, भाजपाचे राज्य परिषद सदस्य विजय भुतडा, नंदकिशोर अग्रवाल, सरपंचा शकुंतलाबाई गावंडे, जि.प. सदस्या नलिनीताई गावंडे, सभापती जिजाबाई प्रकाश धामोळे, कांचनबाई जयस्वाल, मिनाताई भास्कर, राजवंतीबाई विश्‍वकर्मा, भारत वाघ, जानराव गोरे, प्रमोद गोसावी, निलेश केसाळे, प्रमोद खोद्रे, रमेश खोवले, सोहमआप्पा वडशंकर, श्रीराम दाभाडे, नंदकिशोर विश्‍वकर्मा, रविंद्र दांडगे, मनोज अमानकर, जयराम इंगळे, अशोक मुरूख, श्याम आकोटकार, डॉ.शेख, संजय शिंगणापुरे, तुकाराम काळपांडे, प्रदीप सोळंके, राजेश गोटेचा, राजेश मुयांडे आदिंसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आमदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना आमदारांनी सदर योजनेचे काम चांगल्या रितीने दज्रेदारपणे झाले पाहिजे व लवकरात लवकर जनतेपर्यंत पाणी पोहचले पाहिजे हाच प्रयत्न असणार आहे. मतदार संघाचा विकास करण्यासाठी सर्वसामान्यांचा विश्‍वास जिंकण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करून चांगली माणसे जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणाईचे मने जिंकल्याने मोठय़ा संख्येने यावेळी तरूणांमध्ये जागृती झाली व सत्ता परिवर्तन झाले. आता राज्यासाठीही कामाला लागण्याची वेळ आली आहे. या योजनेत सर्वच गावांचा समावेश आहे. हे सर्व जनतेच्या सहकार्यानेच झाले, असेही सांगितले. संचालन आणि आभार प्रदर्शन डॉ.शेख यांनी केले.