शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

महिनाभरात १४ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 4, 2014 00:53 IST

नव्या सरकारवर शेतकरी आत्महत्यांचे सावट : हवालदिल शेतक-यांना हवा आधार.

बुलडाणा : सुगीचा हंगाम सुरू झाल्यावर शेतकर्‍यांच्या घरात शेतीमालाचे उत्पन्न येते, खरिपाच्या हंगामात लावलेला पैसा शेतमाल विकुन हिशेब जुळविला जातो. यावर्षी मात्र खरिपाचा हंगाम पुर ता हातातून गेल्यामुळे सुगीचा हंगाम हा शेतकर्‍यांसाठी आत्महत्येचा हंगाम ठरला आहे. १ नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत तब्बल १४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. २८ ते २९ नोव्हेंबरच्या ४८ तासात तब्बल ५ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे समोर आले आहे.२८ नोव्हेंबरपासून पुढील ४८ तासातच पाच शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, त्यामध्ये २८ नोव्हेंबर रोजी खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील रामकृष्ण गावंडे, २९ नोव्हेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील देऊळघाटचे विष्णू वानखडे, शेगाव तालुक्यातील जवळा येथील शिवाजी जवळकार, लोणार तालुक्यातील गंधारी येथील गुलाब रामसिंग जाधव, तर ३0 नोव्हेंबर रोजी चिखली तालुक्यातील पांढरदेवचे पांडुरंग चवरे यांचा समावेश आहे. काल २ डिसेंबर रोजी जवळा येथीलच गणेश मुरलीधर कान्हेरकर (वय ३२) या शेतकरी पुत्राने सकाळी ८ वाजताच्या दरम्यान गुरांच्या गोठय़ात विष प्राशन केले. जिल्ह्यात मागील १४ वर्षात १ हजार ५९९ शेतकर्‍यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्या. त्यापैकी शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या ६१0 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली, तर ९६८ शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना विविध कारणान्वये मदत नाकारण्यात आली. या आत्महत्यामध्ये आजारपणा, व्यसनाधिनता, अपघात, बेरोजगारी, घरगुती भांडणो आदी कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचा समावेश आहे. यावर्षी खरि पामध्ये उशिरा आलेला पाऊस व परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.