शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

महिनाभरात १४ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 4, 2014 00:53 IST

नव्या सरकारवर शेतकरी आत्महत्यांचे सावट : हवालदिल शेतक-यांना हवा आधार.

बुलडाणा : सुगीचा हंगाम सुरू झाल्यावर शेतकर्‍यांच्या घरात शेतीमालाचे उत्पन्न येते, खरिपाच्या हंगामात लावलेला पैसा शेतमाल विकुन हिशेब जुळविला जातो. यावर्षी मात्र खरिपाचा हंगाम पुर ता हातातून गेल्यामुळे सुगीचा हंगाम हा शेतकर्‍यांसाठी आत्महत्येचा हंगाम ठरला आहे. १ नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत तब्बल १४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. २८ ते २९ नोव्हेंबरच्या ४८ तासात तब्बल ५ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे समोर आले आहे.२८ नोव्हेंबरपासून पुढील ४८ तासातच पाच शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, त्यामध्ये २८ नोव्हेंबर रोजी खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील रामकृष्ण गावंडे, २९ नोव्हेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील देऊळघाटचे विष्णू वानखडे, शेगाव तालुक्यातील जवळा येथील शिवाजी जवळकार, लोणार तालुक्यातील गंधारी येथील गुलाब रामसिंग जाधव, तर ३0 नोव्हेंबर रोजी चिखली तालुक्यातील पांढरदेवचे पांडुरंग चवरे यांचा समावेश आहे. काल २ डिसेंबर रोजी जवळा येथीलच गणेश मुरलीधर कान्हेरकर (वय ३२) या शेतकरी पुत्राने सकाळी ८ वाजताच्या दरम्यान गुरांच्या गोठय़ात विष प्राशन केले. जिल्ह्यात मागील १४ वर्षात १ हजार ५९९ शेतकर्‍यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्या. त्यापैकी शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या ६१0 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली, तर ९६८ शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना विविध कारणान्वये मदत नाकारण्यात आली. या आत्महत्यामध्ये आजारपणा, व्यसनाधिनता, अपघात, बेरोजगारी, घरगुती भांडणो आदी कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचा समावेश आहे. यावर्षी खरि पामध्ये उशिरा आलेला पाऊस व परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.