शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

१४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: April 2, 2016 00:50 IST

साखरखेर्डा येथील घटना; माहेरच्या मंडळीकडून सासरकडील मंडळीस मारहाण.

साखरखेर्डा (जि. बुलडाणा) : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत रानअंत्री येथील सासरकडील मंडळीकडून मुलीला शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याच्या कारणावरून माहेरकडील मंडळीने रानअंत्री येथे येऊन एकास मारहाण केली. त्यावरून साखरखेर्डा पोलिसांनी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रानअंत्री येथील उकंडा झाल्टे यांच्या लहान मुलाला वाशिम जिल्ह्यातील किनखेडा येथील भास्कर नामदेव अवचार यांची मुलगी दिली होती. लग्नाला ८ वर्ष झाली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन वर्षांपासून मुलीचा सतत शारीरिक व मानसिक छळ होत होता. मुलीला सतत त्रास होत असल्याने भास्कर अवचार यांनी नात्यातील काही मंडळी जमवून उकंडा झाल्टे आणि त्यांच्या मुलाला समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या दोघात कौटुंबीक खटके उडत गेले. १५ दिवसांपूर्वी विवाहित महिलेने पती, सासरा, सासू, दीर यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. ती तक्रार पोलिसांनी चौकशीवर ठेवून समोपचाराने प्रकरण मिटविण्यासाठी महिला दक्षता विभागाकडे वर्ग केले. बुधवारी एम.एच.३७ ए.२७७0 आणि एम.एच.३७ जी-९७१३ या वाहनातून विवाहित महिलेचे वडील भास्कर नामदेव अवचार रा.निमखेडा, गोपाल प्रकाश पारीसकर चिखली, ता.रिसोड, दिनकर शिवाजी अवचार, पंजाब पांडुरंग अवचार, चंद्रकांत प्रभाकर जाधव, प्रकाश बाबूराव अवचार आणि इतर ७ ते ८ व्यक्ती रानअंत्री येथे आले आणि गजानन उकंडा झाल्टे यांच्या शेतात जावून गजानन झाल्टे यास भावजयीस त्रास का देतो, म्हणून स्टम्प, हॉकी स्टीक व काठय़ाने मारहाण करून जखमी केले. गजानन उकंडा झाल्टे यांच्या फिर्यादीवरून ठाणेदार नीलेश ब्राम्हणे यांनी कलम १४७, १४८, १४९, ३२४, ५0४, ५0६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉं संजय कोल्हे, पो.काँ. सुभाष म्हस्के, गणेश गाभणे करीत आहेत.