शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३०० कोटींची कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:45 IST

एक लाख ९८ हजार १५९ शेतकºयांना लाभ होणार असून साधारणत: १३०० कोटी रुपयांच्या आसपास कर्जमाफी मिळण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक घडी विस्कळीत झालेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील एक लाख ९८ हजार १५९ शेतकºयांना लाभ होणार असून साधारणत: १३०० कोटी रुपयांच्या आसपास कर्जमाफी मिळण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.बुलडाणा जिल्ह्यात चार लाख ९१ हजार १५८ शेतकरी असून यापैकी ३१ मार्च २०१९ दरम्यान तीन लाख एक हजार १६७ शेतकरी हे किसान क्रेडीट कार्ड धारक शेतकरी होते तर याच तारखेअखेर जिल्ह्यातील एक लाख ९८ हजार १५९ शेतकरी हे थकबाकीदार होते. त्यापैकी एक लाख २४ हजार ५१९ शेतकºयांचे पीक कर्ज हे ओव्हरड्यू होते तर पूर्वीच्या शेतकरी कर्जमाफीमधील दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळून त्यावरील उर्वरित कर्ज हे ओटीएस अर्थात वनटाईम सेटलमेंटमध्ये न भरलेल्या शेतकºयांची संख्या २५ हजार ६४१ ऐवढी शेतकºयांची संख्या आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या मात्र त्याचा लाभ मिळू न शकलेल्या शेतकºयांची संख्या ही ४७ हजार ९९९ होती. या सर्व शेतकºयांनाही आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्यात जमा झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली दोन लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी ही ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या कर्जघेतलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ अखेर थकबाकीदार असलेल्या एक लाख ९८ हजार १५९ शेतकºयांच्या संख्येत आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा निश्चित आकडा समोर आला नाही. मात्र खरीपामध्ये असलेल्या एक हजार ७७३ कोटी ७७ लाख ४० हजार रुपयांच्या पीक कर्ज वाटपाच्या उदिष्टाच्या तुलेत ४१३.५७ कोटी रुपयांचे ५२ हजार ६१९ शेतकºयांना वाटप करण्यात आले होते. त्यामुळे आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत या शेतकºयांचाही समावेश या योजनेत असणार आहे. त्यामुळे वर्तमान उपलब्ध असलेल्या शेतकºयांच्या संख्येत आणखी वाढ होणार असल्याचे संकेत असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.जिल्हा केंद्रीय बँकेला वाचविण्यासाठी ज्या १६ हजार शेतकºयांनी ८३ कोटी रुपयांच्या कर्जाचा भरणा करून बँकेचा परवाना वाचविला होता. त्या शेतकºयांनाही या कर्जमाफीच्या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे. हे शतकरी नियमित कर्ज भरणा करणारे आहेत. दोन वर्षापासून त्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी बँक प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्या जात होते. त्यांच्यासाठी हा दिलासा म्हणावा लागेल..- डॉ.अशोक खरात, सीईओ, बीडीसीसी

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी