शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू, ८५८ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

दरम्यान, मृत्यू झालेल्यांमध्ये खामगाव तालुक्यातील शिरसगाव येथील ६८ वर्षीय पुरुष, खामगावातील केशवनगरमधील ४५ वर्षीय पुरुष, खामगावातीलच ४५ वर्षीय ...

दरम्यान, मृत्यू झालेल्यांमध्ये खामगाव तालुक्यातील शिरसगाव येथील ६८ वर्षीय पुरुष, खामगावातील केशवनगरमधील ४५ वर्षीय पुरुष, खामगावातीलच ४५ वर्षीय महिला, रोहणा येथील ६५ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातीलच सारोळा येथील ६२ वर्षीय पुरुष, समन्वयनगरमधील मधील ३५ वर्षीय पुरुष, सती फैलातील ७१ वर्षीय पुरुष, शेगावातील आरोग्य कॉलनीमधील ५२ वर्षीय महिला, मेहकर तालुक्यातील वर्दडी येथील ५५ वर्षीय महिला, बुलडाण्यातील ४६ वर्षीय पुरुष चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील ६० वर्षीय पुरुष आणि चिखली तालुक्यातील अमडापूर येथील ६१ वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे.

बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्ट किटद्वारे तपासण्यात आलेल्या ५ हजार ३८६ अहवालांपैकी ४ हजार ५२८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ८५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४१५ व रॅपीड टेस्टमधील ४४३ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ९९१ तर रॅपिड टेस्टमधील ३,५३७ अहवालांचा समावेश आहे.

दुसरीकडे पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ९०, खामगाव तालुक्यातील ७४, शेगाव तालुक्यातील २०, देऊळगाव राजा तालुक्यातील १११, चिखली तालुक्यातील ९६, मेहकर तालुक्यातील ५२, मलकापूर तालुक्यातील ३८, नांदुरा तालुक्यातील ८०, लोणार तालुक्यातील ७३,मोताळा तालुक्यातील ३३, जळगाव जामोदमधील ४८, सिंदखेड राजातील १३९, संग्रामपूरमधील चार जणांचा यात समावेश आहे.

दुसरीकडे बुधवारी ५२८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोबतच आजपर्यंत तपासण्यात आलेल्यांमध्ये ३ लाख १३ हजार २०१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ५४ हजार ८२१ झाली असून त्यापैकी ४७ हजार १४२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

--६,८१५ अहवालांची प्रतीक्षा--

बुधवारी ६ हजार ८१५ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आले असून वर्तमान स्थितीत जिल्ह्यात ७ हजार ३२६ सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ३५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २१ एप्रिल रोजीचा जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.३९ टक्के असून जिल्ह्याचा एकूण मृत्यूदर हा ०.६४ टक्के आहे.