शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

अनुराधा फार्मसीचे ११ विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:36 IST

चिखली : स्थानिक अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या तब्बल ११ विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादित करीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता ...

चिखली : स्थानिक अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या तब्बल ११ विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादित करीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत.

अमरावती विद्यापीठाने बी.फार्म अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या १० जणांची गुणवत्ता यादी ५ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केली आहे़. या एकूण १० मध्ये अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या ८ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करण्याचा बहुमान मिळविला आहे. तर एम. फार्म क्वॉलिटी अशुरन्स या पदव्युत्तर पदवी विद्याशाखेतून एका विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकावला आहे़ तर विद्यापीठाच्या गुणवत्तायादीत विद्यापीठातून प्रथम मेरीट येण्याचा मान जयश्री मानवतकर हिने मिळविला असून तिला ८.६४ गुण मिळाले आहेत. तर भाग्यश्री भुतेकर हिने ८.६१ गुण संपादन करून दुसरे स्थान मिळविले आहे. चौथ्या स्थानावर ८.३३ गुणांसह आंचल सुनील कांबळे, पाचव्या स्थान अश्विनी भुतेकर हिने पटकाविले असून ८.३२ गुण संपादन केले, मनोहर गदादे याने ८.३० गुण मिळवून सहावे, किरण भारसाकळे ८.२९ गुण मिळवून सातवे, मारोती दिवटे याने ८.२६ गुण मिळवून नववे तर श्वेता लेंभे, सीमा मानमोडे आणि शेख मोहसिन शेख मोहम्मद तिघांनी समान ८.२५ गुण मिळवून दहावे स्थान मिळविले आहे. तर एम.फार्म क्वॉॅलिटी अशुरन्स या पदव्युत्तर पदवी विद्याशाखेतून ८.४८ गुण संपादन करून गुणवत्ता यादीत तिसरे स्थान निशा गडीया हिने पटकाविले आहे. संस्थेच्या या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब बोंद्रे, सचिव तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ़ व्ही.आर.यादव, विश्वस्त सिध्देश्वर वानेरे, सलिमोददीन काझी, आत्माराम देशमाने, अनंतराव सराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी, प्राचार्य डॉ. आर. एच. काळे व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. एका छोटेखानी कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा !

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठअंतर्गत एकूण २१ फार्मसी महाविद्यालयांतून दरवर्षी विद्यापीठात प्रथम येणाऱ्या १० विद्यार्थ्यांची दीक्षांत समारंभापूर्वी गुणवत्ता यादी जाहीर करीत असते. या गुणवत्ता यादीत अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीचे तब्बल ११ विद्यार्थी झळकण्यासह महाविद्यालयातील बी.फार्मची विद्यार्थिनी जयश्री मानवतर हिने विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.