शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बुलडाणा जिल्ह्यात ‘१०८’ रुग्णवाहिकेची चाके मंदावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:19 IST

जिल्ह्यात २३ च्या जवळपास रुग्णवाहिका असल्या तरी आपत्कालीन स्थिती तथा अपघातप्रसंगी त्या वेळेत घटनास्थळी पोहचत नसल्याची ओरड आहे.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आपत्कालीन स्थितीमध्ये त्वरीत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, या दृष्टीकोनातून जिल्ह्यात कार्यान्वीत करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेची गती मंदावल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यात २३ च्या जवळपास रुग्णवाहिका असल्या तरी आपत्कालीन स्थिती तथा अपघातप्रसंगी त्या वेळेत घटनास्थळी पोहचत नसल्याची ओरड आहे. विशेष म्हणजे यापैकी काही रुग्णवाहिका या बंद अवस्थेत असून काहींमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. आधीच जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण ‘रेफर टु’ करण्याचे ग्रहण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर किमानपक्षी ही सेवा गुणात्मक दर्जाने दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रुग्णांवर तत्काळ उपचार व्हावे, या उद्देशाने २६ जानेवारी २०१४ पासून १०८ रुग्णवाहिकेची सेवा राज्यभर सुरू करण्यात आली आहे. सर्व जिल्हा स्तरावर हे काम बीव्हीजी या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. नियामानुसार एका रुग्णवाहिकेवर एक डॉक्टर, एक चालक आणि एका परिचारकाची आवश्यकता असते. यानुसार जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आलेल्या २३ रुग्णवाहिकांपैकी ५ रुग्णवाहिका बंद आहेत. सेवेत असलेल्या १८ रुग्णवाहिकांसाठी ३६ डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. या रुग्वाहिकांचे कामकाज डॉक्टर तीन पाळ्यांमध्ये पाहतात. आठ तासाच्या पाळीनुसार १८ रुग्णवाहिकांसाठी आवश्यक असलेले डॉक्टर सध्या उपलब्ध आहेत. काही ठिकाणी परिचारकाचे काम रुग्णवाहिकेचे चालकच करत असल्याचे कथीतस्तरावर सांगितले जात आहे.सुरूवातीच्या काळात १०८ रुग्णवाहिकांचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. या क्रमांकावर फोन करताच २० ते ३० मिनीटाच्या आत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. मात्र अलीकडच्या काळात या रुग्णवाहिका वेळेवर पोहचत नसल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यामुळे जखमींवर वेळेत उपचार न झाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याच्या घटनाही मधल्या काळात घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा कार्यक्षमपणे कार्यान्वीत करण्याची गरज आहे. रुग्णवाहिकांच्या समन्वयकांकडून सेवा पुरविण्यास काही कुचराई होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम जिल्हा शल्य चिकित्सकांचे आहे. त्यामुळे कामात हलगर्जी करणाऱ्या रुग्णावाहिकेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून पाऊल उचलणे अपेक्षित आहे. जेणेकरून अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार होऊन त्यांचा जीव वाचू शकेल.सध्या जिल्ह्यात २३ रूग्णवाहीकांपैकी १८ रुग्णवाहिका सेवेत आहेत. ही जबाबदारी बीव्हीजी या खासगी कंपनीकडे देण्यात आली आहे. यावर जिल्हा शल्य चिकित्सक या नात्याने आपले नियंत्रण आहे. सोबतच ही सेवा योग्य पद्धतीने दिल्या जात आहे.- डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्य चिकित्सक

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा