शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

बुलडाणा जिल्ह्यात १0 हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 19:58 IST

जिगाव प्रकल्पासह बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात एकाच दिवशी १0 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रारंभ होत असल्याचे सांगत जिगाव प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार जिल्ह्याला ६६५ कोटी रुपयाची मिळाली कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरा : ज्यांनी आभाळाला भोकं पाडली तेच आता आभाळ फाटल्याची बोंब ठोकत आहेत, असा टोला मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आमचे सरकार शेतकर्‍यांचे असून आतापयर्ंत जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ८४५ शेतकर्‍यांच्या खात्यात ६६५ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगून जिगाव प्रकल्पासह जिल्ह्याच्या इतिहासात एकाच दिवशी १0 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रारंभ होत असल्याचे सांगत जिगाव प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ त्यांनी केला. नांदुरा येथील कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात रविवार, १७ डिसेंबर रोजी आयोजीत कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव, आ. आकाश फुंडकर, आ. चैनसुख संचेती, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींची उपस्थिती होती. यावेळी सरकारने सर्व प्रलंबीत प्रकल्पांना संजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून यासाठी निधी खेचून आणला. १0८ प्रकल्पामुळे सिंचनाच्या सोयी शेतकर्‍यापयर्ंत पोहचू शकणार आहे. यासाठी प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ मान्यता दिली. ३0 हजार कोटी रुपये यासाठी मंजूर झाले. जी कामे अर्धवट सोडली आहेत. ती कामे हातात घेवून पुर्णत्वात नेण्यासाठी येत्या २ वर्षात प्रयत्न केले जातील. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आम्ही कटाक्षाने काळजी घेत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तीन पिढ्या रस्त्यात खड्डे पडणार नाही : नितीन गडकरी ३१ ऑक्टोबर रोजी केलेल्या कामाचा शुभारंभ झाला होता ही कामे आज पुर्णत्वास येत आहेत. नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, खामगाव आदी तालुक्यातील रस्ते, पूलाचे काम सुरु झाले आहे. खामगाव, नांदुरा, जळगाव आदी शहरातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन पिढ्या रस्त्यात खड्डे पडणार नाही असे १00 टक्के गुणवत्ता असलेले रस्ते आम्ही देवू अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. 

२२ हजार कोटी रुपये शेतकर्‍याच्या खात्यात : कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर राज्यातील २२ हजार कोटी रुपये शेतकर्‍याच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. जिल्हयातील शेतकर्‍यांना प्राधान्य देत ६६५ कोटी रुपयाची कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे कुणीही दिशाभूल करू नका असा इशारा कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbuldhanaबुलडाणाNitin Gadakriनितिन गडकरी