शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

२७ दिवसांत १0 शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: August 28, 2015 00:21 IST

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच ; आठ महिन्यांत १0५ आत्महत्या.

बुलडाणा : शेतकरी आत्महत्येचे सत्र बुलडाणा जिल्ह्यात सुरूचआहे. गत आठ महिन्यात जिल्ह्यात १0५ शे तकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून, ऑगस्ट महिन्याच्या २७ दिवसांत १0 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मागील दहा वर्षांमध्ये १६२0 शेतकरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या आ त्महत्याप्रकरणी प्रशासनाने केवळ ६२५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९६९ प्रकरणे नामंजूर केली. दुर्दैवाची बाब म्हणजे, पात्र प्रकरणांपेक्षा अपात्र प्रकरणांचाच आकडा जास्त असल्यामुळे मरणानंतरही या शेतकर्‍यांना न्याय मिळू शकला नाही. जिल्ह्यात सन १ जानेवारी ते २७ ऑगस्ट दरम्यान, नापिकी व कर्जबाजारी झालेल्या १0५ शेतकर्‍यांनी आ त्महत्या केल्याची शासनदप्तरी नोंद आहे. शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये आत्महत्येची कारणे शोधली असता, कर्ज आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही शासनाने केवळ ३५ प्रकरणेच प्रशासनाने पात्र ठरविली, तर १९ आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. ५१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. यावर्षी सुरुवातीला अवकाळी पावसाने जिल्ह्यात िपकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरू असून, २५, २६ आणि २७ ऑगस्ट या तीन दिवसांत पाच शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली. *यावर्षी १९ प्रकरणे ठरविली अपात्र शेतकरी आत्महत्येचे सत्र सन २00५ पासून सुरू झाले. यादरम्यान १६२0 शेतकरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. प्रशासनाने केवळ ६२५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९६९ प्रकरणे नामंजूर केली आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २0१५ या काळात जिल्ह्यात १0५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. यापैकी शासनाने विविध निकष लावून १९ प्रकरणे अपात्र ठरविली. यात आजारपणामुळे दोन, व्यसनाधीनता सहा, अपघात दोन, बेरोजगारी एक आणि घरगुती भांडणातून नऊ शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे शासकीय अहवालात नमूद केले आहे.