शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांमधील किलबिलाट ६ मे पासून होणार बंद

By admin | Updated: April 9, 2017 00:26 IST

उन्हाची तिव्रता प्रचंड असल्याने त्याची झळ विद्यार्थी व शिक्षकांना सोसावी लागत आहे.

उन्हाळी सुट्या : शिक्षण समितीने घेतला सर्वानुमते ठरावभंडारा : उन्हाची तिव्रता प्रचंड असल्याने त्याची झळ विद्यार्थी व शिक्षकांना सोसावी लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सर्व शाळांना ६ मे पासून उन्हाळी सुट्या देण्याचा ठराव घेण्यात आला. शुक्रवारी शिक्षण समितीच्या झालेल्या सभेत हा ठराव सर्वानुमते पारित केला. उष्णतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता १० मार्चला शिक्षण समितीच्या सभेत जिल्ह्यातील सर्व शाळा १५ मार्चपासून सकाळपाळीत घेण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. आता महिन्याभरानंतर झालेल्या शुक्रवारच्या सभेत या सर्व शाळांना ६ मे पासून उन्हाळी सुट्या देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. मागील वर्षी १४ मे पासून शाळांना उन्हाळी सुट्या दिल्यागेल्या होत्या. यावर्षी आठ दिवसांपुर्वी या सुट्या लागत आहे. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पार पडलेल्या शिक्षण समितीची सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे, समिती सदस्य अशोक कापगते, हेमंत कोरे, प्रणाली ठाकरे, राणी ढेंगे, वर्षा रामटेके, संगिता मुंगुसमारे, प्रेरणा तुरकर, धनेंद्र तुरकर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगणजूडे आदींसह शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी उन्हाळा सुरू झाला असल्याने तापमानात वाढ होत असून प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना याची झळ सोसावी लागत असल्याचा मुद्दा मुबारक सय्यद यांनी उपस्थित केला. अनेक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावावरून शाळेत येत असतात. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. दुरवरच्या शाळेत जाताना मार्गात सोयीसुविधा नसल्याने वेळप्रसंगी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यास मदत मिळत नाही. त्यामुळे ६ मे पासून शाळांना उन्हाळी सुट्या द्याव्या असा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यावर समितीने ठराव घेतला. यासोबतच खेळोत्तेजक मंडळाला नवसंजीवनी देऊन पुढील वर्षीच्या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धा घेण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. या स्पर्धांसाठी लागणाऱ्या खर्चाचा विनियोग जिल्हा परिषद फंडातून करण्यात यावा व याकरिता एका समितीचे गठण करुन स्पर्धा पार पाडाव्या असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या मंडळाच्या भविष्यात निवडणूका होणार नसल्याचाही ठराव घेण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेची मदत घेण्याचाही मुद्दा यावेळी उपस्थीत करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा डिजीटल करण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी द्यावा, अशी मागणी या सभेत लावून धरण्यात आली. (शहर प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना प्रवास खर्चाची तरतूदशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगीरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, स्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. अशा विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेकदा पैशाची अडचण भासते त्यामुळे अशा होतकरु व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने त्याचा खर्च उचलावा, असा मुद्या मुबारक सय्यद यांनी लावून धरला. त्यावर सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला.मागण्यांना समितीचा पाठिंबाजिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत अनेक दिवसांपासून शिक्षक संघटना जिल्हा परिषद प्रशासनाविरुध्द लढा देत आहेत. हक्क असतानाही त्यांच्या मागण्यांना केवळ आश्वासन दिले जात आहे. या मागण्या न्याय असून शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून यानंतर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिक्षकांच्या मागण्यांना शिक्षण समितीचा पूर्ण पांिठंबा असल्याचेही या सभेत उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी सांगितली.