शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
3
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
4
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
5
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
6
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
7
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
8
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
9
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
10
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
11
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
12
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
13
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
14
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
15
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
16
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
17
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
18
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
19
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान
20
Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

काेराेना संकटात जिल्हा परिषद वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

भंडारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार काेराेना संकटात वाऱ्यावर दिसत आहे. प्रशासकांच्या नियुक्तीपासूनच येथील यंत्रणेवरील ...

भंडारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार काेराेना संकटात वाऱ्यावर दिसत आहे. प्रशासकांच्या नियुक्तीपासूनच येथील यंत्रणेवरील संपूर्ण नियंत्रण गेले असून, आता काेराेना संकटात अधिकारी दिशाहीन झाले आहेत. ग्रामीण आराेग्यासह विकासाची मुख्य जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेवर सध्या कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. प्रशासक झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी तर कुणाला दिसतही नाहीत. ग्रामीण आराेग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष हाेत असल्याने काेराेनाचा संसर्ग वाढला असून, आता लसीकरणाचाही बट्ट्याबाेळ हाेत आहे. भंडारा जिल्हा परिषदेची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्याकडे प्रशासकाचा प्रभार आहे. परंतु, त्यांचे आपल्या अधिनस्त यंत्रणेवर काेणतेही नियंत्रण नसल्याचे काेराेना संकटात प्रकर्षाने जाणवू लागले आहे. सर्वत्र काेराेनाने जनता भयभीत असताना प्रशासक काेणतीही बैठक घेताना दिसत नाहीत. आधीच काेराेना संसर्गामुळे जिल्हा परिषदेचा कारभार १५ टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण कामकाज ढेपाळले आहे.

ग्रामीण आराेग्य यंत्रणेची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. गावागावांमध्ये काेराेनाचे रुग्ण आहेत. अलीकडे लसीकरण सुरु झाले आहे. मात्र, प्रशासकांना त्याचे काही देणे-घेणे दिसत नाही. आराेग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी आपल्या मनमर्जीने कारभार करत आहेत. याचा फटका ग्रामीण जनतेला सहन करावा लागत आहे. लसीकरणासाठी ॲपवर नाेंदणी केल्यानंतरही आणि कन्फर्मेशन झाल्यानंतरही लस मिळेलच, याची काेणतीही खात्री नाही. दुसरीकडे आराेग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे लसीबाबत ग्रामीण भागात प्रचंड गैरसमज आहे. नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. मात्र, या नागरिकांचे समुपदेशन अथवा गावागावात जावून त्यांना मार्गदर्शन करण्याची आराेग्य यंत्रणेला फुरसत मिळालेली नाही.

काेराेनाची तिसरी लाट येणार, अशी भीती वर्तवली जात आहे. परंतु, दुसऱ्याच लाटेत गारद झालेली जिल्हा परिषदेची आराेग्य यंत्रणा तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी काय करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी गावागावात जावून भेट देत आहेत. रुग्णालयातही पाहणी करत आहेत. परंतु, जिल्हा परिषद आराेग्य यंत्रणेचे त्यांना सहकार्यच मिळत नाही. अधिकारी केवळ कागदाेपत्रीच घाेडे नाचवत असल्याचे दिसत आहे. पुढे तक्रार केली तर काेराेना संसर्गाने काम वाढल्याचा दावा करुन तक्रारीकडे पाठ फिरवली जाते. एकंदरच जिल्हा परिषदेच्या या नाकर्तेपणामुळे जनतेला मात्र नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

बाॅक्स

लाेकप्रतिनिधींची चुप्पी

जिल्हा परिषदेची घडी प्रशासक नियुक्तीपासून पूर्णत: विस्कटली आहे. जिल्हा परिषदेवर लाेकनियुक्त पदाधिकारी असताना प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारला जात हाेता. अध्यक्षांपासून सभापतींपर्यंत सर्वजण त्यावर नजर ठेवून हाेते. परंतु, आता लाेकनियुक्त पदाधिकारी नसल्याने जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रान माेकळे झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात प्रशासकांना जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. त्यांनी साकाेली येथे काही वर्ष उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. परंतु, त्यांची जिल्हा परिषदेवरील पकड काेराेना काळात सुटली आहे. दुसरीकडे आमदार, खासदार आणि विविध पक्षांचे जिल्हाप्रमुखही या प्रकारावर मूग गिळून गप्प आहेत. काेणत्याही लाेकप्रतिनिधीने पालकमंत्र्यांच्या बैठकीत याबाबतचा प्रश्न विचारलेला नाही.

बाॅक्स

भुवनेश्वरी एस. यांचा गाजलेला कार्यकाळ

थेट आयएएस असलेल्या भुवनेश्वरी एस. यांनी जिल्हा परिषदेला ताळ्यावर आणले हाेते. काेराेनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी जिल्हा परिषदेची आघाडी उत्तमरित्या सांभाळली. प्रत्येक अधिकाऱ्याशी बैठक, जिल्हा प्रशासनासी अधिकारी समन्वय साधून हाेते. त्यांचा जिल्हा परिषदेत दरारा हाेता. अनेकदा जिल्हा परिषदेतील विविध कक्षांना अचानक भेट देऊन त्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेत हाेत्या. मात्र, आता हे सर्व इतिहासजमा झाले आहे. जिल्हा परिषदेत काेणी कुणाला जुमानायला तयार नाही. आराेग्य यंत्रणा तर पूर्णत: हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भुवनेश्वरी एस. यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचीच जिल्हा परिषदेला गरज आहे.