शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तलाव पुनरूज्जीवनासाठी प्रशासन उपाययोजना शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर तलाव आहेत. माजी मालगुजारी तलावांची सध्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. परंतु निधीअभावी या तलावांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक गावात एक तलाव हमखास आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग सिंचनासोबत भूगर्भातील जलस्तर वाढण्यात होतो. मात्र अलिकडे या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

ठळक मुद्देजलसंकट : ६१७ गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारातील गावागावांतील तलावांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रशासनाच्या उपाययोजना शून्य दिसत आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात जिल्ह्यातील तब्बल ६१७ गावांचा समावेश आहे. वेळीच या तलावांचे पुनरूज्जीवन केल्यास कृती आराखड्यातील लाखो रुपयांचा निधी वाचू शकतो. परंतु दरवर्षी कृती आराखडा तयार करणारे प्रशासन तलावांच्या पुनरूज्जीवनाकडे मात्र लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर तलाव आहेत. माजी मालगुजारी तलावांची सध्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. परंतु निधीअभावी या तलावांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक गावात एक तलाव हमखास आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग सिंचनासोबत भूगर्भातील जलस्तर वाढण्यात होतो. मात्र अलिकडे या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात तुडूंब दिसणारे तलाव उन्हाळा आला की कोरडे पडायला लागतात. जिल्ह्यातील या तलावातील गाळ काढण्यासाठी तीन वर्षापूर्वी विशेष उपाययोजना करण्यात आली. परंतु ती प्रभावीपणे राबविण्यात आली नाही.आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणार आहेत. एकीकडे शासनाने भंडारा जिल्हा टँकरमुक्त म्हणून घोषीत केला आहे. परंतु जिल्ह्यातील तब्बल ६१७ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे खुद्द पाणीटंचाईच्या कृती आराखड्यातच दिसत आहे. प्रशासनाने १२ लाख ९० हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यात विहिर खोलीकरण, गाळ काढणे, विहिरींचे अधिग्रहण, नळयोजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, नवीन विंधन विहिर, नवीन कूपनलीका आदींचा समावेश आहे.मात्र मालगुजारी काळापासून गावाजवळ असलेल्या तलावांकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी अथांग दिसणारे तलाव आता डबक्यासारखे दिसत आहे.शासनाकडे निधीची मागणी करूनही पुरेसा निधी मिळत नाही. अनेक तलावांवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. २५ ते ३० हेक्टरचे असणारे तलाव आता २ ते ३ एकरात सामावले आहेत. या तलावांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष प्रयत्न केले तर भंडारा जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात येईल आणि सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.३०० वर्षापूर्वीचे मामा तलावभंडारा परिसरावर ३०० वर्षापूर्वी गोंड राजाचे साम्राज्य होते. आजही त्याच्या पाऊलखुणा दिसून येतात. साधारणत: ३०० वर्षापूर्वी या तलावांची निर्मिती करण्यात आली. पूर्वी सर्वाधिक तलाव भंडारा जिल्ह्यात होते. आता जिल्ह्याचे विभाजन झाल्याने साधारणत: १३०० तलाव आजही जिल्ह्यात आहेत. या सर्व तलावांना माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :water shortageपाणीकपात