शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

झरी प्रकल्पाचा प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: December 13, 2014 01:04 IST

लाखांदूर तालुक्यातील दिघोरी बारव्हा परिसरातील अडीच हजार हेक्टर शेतीला कायमस्वरुपी सिंचनाची सोय व्हावी, यासाठी झरी प्रकल्पाचा प्रस्ताव मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे.

बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी बारव्हा परिसरातील अडीच हजार हेक्टर शेतीला कायमस्वरुपी सिंचनाची सोय व्हावी, यासाठी झरी प्रकल्पाचा प्रस्ताव मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. गेल्या दोन पंचवार्षिक योजनांपासून केवळ निवडणुका आल्या की प्रचाराच्या वेळीच लोकप्रतिनिधी झरी प्रकल्प आठवतो. मात्र निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी या प्रकल्पाबाबत एकही शब्द काढत नाही. लोकप्रतिनधींच्या दुर्लक्षितपणामुळे प्रशासकीय मान्यतेनंतरही प्रकल्पाचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, दिघोरी परिसरातील शेती पूर्णत: कोरडवाहू आहे. यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. पाण्याअभावी हजारो हेक्टर शेतजमिनीतीलपिक करपतो. इटियाडोह प्रकल्पाचे पाणी झरी तलावात सोडून त्यांचा उपसा पद्धतीने सिंचनासाठी वापर करणे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पासाठी सन १९९६ पासून आंदोलने सुरु झालीत. सन २००६ ला लाभक्षेत्र प्राधिकरण पत्रक तयार करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निवासस्थानासमोेर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी जलसंपदा विभागाने तलावाची मागणी मुख्य अभियंता स्तरावरील असलेल्या कारणाने व प्रशासकीय मान्यतेचे अधिकार विदर्भ पाटबंधारे विभाग विकास महामंडळ यांना दिल्यामुळे पुन्हा प्रस्ताव तयार करण्यात आला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने कार्यालयीन पत्राद्वारे उपसा सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिल्याचे कळविले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरण यांनी त्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर २२ एप्रिल २०११ च्या शासन परिपत्रकानुसार २५ कोटी रुपयापेक्षा अधिक किमतीचे प्रशासकीय प्रस्ताव तांत्रिक सल्लागार समितीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. योजनेत इटियाडोह कालव्यातून १२.९४ दशलक्ष घनमिटर पाण्याची उचल करून उर्ध्वनलिकेच्या सहाय्याने झरी, दिघोरी, सालेबर्डी या लघु तलावात पाणी सोडणे प्रस्तावित होते. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी सप्टेंबर २०१२ मध्ये २५ कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र लोकप्रतिनिधी मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवून त्यासाठी निधीची व्यवस्था करण्यात आली नाही. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित धोरणामुळे प्रशासकीय मान्यतेनंतरही झरी प्रकल्पाचा प्रस्ताव शासनदरबारी धुळखात पडला आहे. हिवाळी अधिवेशनात तरी या प्रकल्पाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)