शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कान्होबा विसर्जनासाठी स्वत:च्या आचरणातून तरूणाचा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरातील मिस्किन टँक, वैनगंगा नदीघाटावर विसर्जनाच्या दिवशी अस्वच्छता असते. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यामध्ये ...

ठळक मुद्देप्रशासनाने दखल घेण्याची गरज । इको फ्रेंडली मूर्तींसाठी नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील मिस्किन टँक, वैनगंगा नदीघाटावर विसर्जनाच्या दिवशी अस्वच्छता असते. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यामध्ये फारसा बदल होत नसल्याने यावर स्वत:च तोडगा काढण्यासाठी शहरातील राजगोपालाचारी वॉर्डातील रहिवासी विवेक रविंद्र मेश्राम या उच्च शिक्षित तरूणाने कान्होबा घरच्या घरी मूर्ती विसर्जन करून आदर्श निर्माण केला आहे.नदीघाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या शहरवासीयांची संख्या लक्षात घेता हार, फुले, प्रसाद, भुजली, धान्य यासर्वांमुळे कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होते आणि सणाच्या उत्सवाला बाधा निर्माण होते. त्यासाठी काहीतरी केले पाहिजे, यासाठी मेश्राम यांच्यासह त्यांच्या मित्रमंडळींना हा प्रश्न सतावत होता. मात्र यासाठी काय करता येईल, त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना कानोबा विसर्जनासाठी नदीमध्ये, तलावामध्ये मूर्ती विसर्जन न करता कृत्रिम पानवठा तयार करून त्यामध्ये विसर्जन करण्याचा आग्रह धरला.त्याची सुरवात त्यांनी आपल्यापासून करत आपल्या मित्रांच्या साक्षिने घरच्या घरी पूजा, अर्चा झाल्यानंतर विसर्जन एका मोठ्या भांड्यामध्ये करून आदर्श तयार केला आहे. हाच आदर्श इतर नागरिकांनीही व प्रशासनाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या जलप्रदूषणावर आळा घालण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील विविध भागात कृत्रिम पानवठे, तलावांची निर्मिती करून निर्माल्य साहित्यासाठी वॉर्डनिहाय गाड्या पाठवून कचरा गोळा करण्याची गरज आहे.अन्नदानावर केला खर्चसण, उत्सव हे आनंद देण्यासाठी येतात परंतु अलीकडे बदललेल्या जीवनशैलीने उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे.ते बदलण्यासाठी घरी जेवणासाठी मित्रमंडळी,गरजंूना अन्नदान करुन विर्सजणाची वेगळी सुरवात केल्याचे विवेक मेश्राम यांनी सांगितले.

टॅग्स :environmentपर्यावरण