शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कान्होबा विसर्जनासाठी स्वत:च्या आचरणातून तरूणाचा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरातील मिस्किन टँक, वैनगंगा नदीघाटावर विसर्जनाच्या दिवशी अस्वच्छता असते. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यामध्ये ...

ठळक मुद्देप्रशासनाने दखल घेण्याची गरज । इको फ्रेंडली मूर्तींसाठी नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील मिस्किन टँक, वैनगंगा नदीघाटावर विसर्जनाच्या दिवशी अस्वच्छता असते. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यामध्ये फारसा बदल होत नसल्याने यावर स्वत:च तोडगा काढण्यासाठी शहरातील राजगोपालाचारी वॉर्डातील रहिवासी विवेक रविंद्र मेश्राम या उच्च शिक्षित तरूणाने कान्होबा घरच्या घरी मूर्ती विसर्जन करून आदर्श निर्माण केला आहे.नदीघाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या शहरवासीयांची संख्या लक्षात घेता हार, फुले, प्रसाद, भुजली, धान्य यासर्वांमुळे कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होते आणि सणाच्या उत्सवाला बाधा निर्माण होते. त्यासाठी काहीतरी केले पाहिजे, यासाठी मेश्राम यांच्यासह त्यांच्या मित्रमंडळींना हा प्रश्न सतावत होता. मात्र यासाठी काय करता येईल, त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना कानोबा विसर्जनासाठी नदीमध्ये, तलावामध्ये मूर्ती विसर्जन न करता कृत्रिम पानवठा तयार करून त्यामध्ये विसर्जन करण्याचा आग्रह धरला.त्याची सुरवात त्यांनी आपल्यापासून करत आपल्या मित्रांच्या साक्षिने घरच्या घरी पूजा, अर्चा झाल्यानंतर विसर्जन एका मोठ्या भांड्यामध्ये करून आदर्श तयार केला आहे. हाच आदर्श इतर नागरिकांनीही व प्रशासनाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या जलप्रदूषणावर आळा घालण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील विविध भागात कृत्रिम पानवठे, तलावांची निर्मिती करून निर्माल्य साहित्यासाठी वॉर्डनिहाय गाड्या पाठवून कचरा गोळा करण्याची गरज आहे.अन्नदानावर केला खर्चसण, उत्सव हे आनंद देण्यासाठी येतात परंतु अलीकडे बदललेल्या जीवनशैलीने उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे.ते बदलण्यासाठी घरी जेवणासाठी मित्रमंडळी,गरजंूना अन्नदान करुन विर्सजणाची वेगळी सुरवात केल्याचे विवेक मेश्राम यांनी सांगितले.

टॅग्स :environmentपर्यावरण