शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

येरे येरे पावसा, मोहाडीवर रुसलास कसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:59 IST

आकडेमोडीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे आकडे बरे आहेत. इतर तालुक्याच्या तुलनेत मोहाडीवर पावसाची अवकृपा आहे. खरीपाच्या भात लावणीचा हंगाम जोरात असताना अनेक शेत कोरडीच दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी ये रे ये रे पावसा, मोहाडीवर रुसलास कसा, अशी आर्त साद वरुणराजाला घालत आहेत.

ठळक मुद्देहंगाम खरीपाचा : ८९२ हेक्टर रोवणी, अनेक शेत कोरडेच

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : आकडेमोडीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे आकडे बरे आहेत. इतर तालुक्याच्या तुलनेत मोहाडीवर पावसाची अवकृपा आहे. खरीपाच्या भात लावणीचा हंगाम जोरात असताना अनेक शेत कोरडीच दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी ये रे ये रे पावसा, मोहाडीवर रुसलास कसा, अशी आर्त साद वरुणराजाला घालत आहेत.यावर्षी अनुकुल पर्जन्यवृष्टी होईल असा तर्क बांधण्यात आला होता. लगतच्या नागपूर जिल्ह्यात शहरात पूर आला. तसेच भंडारा जिल्ह्यातही सहाही तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. पण मोहाडी तालुक्यात वरुण राजाने बळीराजावर वक्रदृष्टी केली आहे. पावसाअभावी उशिरा भात पिकाचे रोपे घालण्यात आली. रोपांना जीवंत ठेवण्याएवढा पाऊस झाला. रोपे आता रोवणीसाठी यायला लागली. परंतु अनेक शेतकºयांची जमीन कोरडीच दिसून येत आहे. पुनर्वसू पावसाचा नक्षत्र संपायला एक आठवडा शिल्लक आहे. या अगोदर रोहणी, मृग, आद्रा ही पावसाची नक्षत्र निघून गेली आहेत. पर्यन्य योग, उपयुक्त पाऊस पडण्याची एवढी आशा शिल्लक आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकºयांनीच धान पिकाच्या रोवणीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत २८ हजार ८६४ हेक्टर आर भात पिकाच्या क्षेत्रापैकी केवळ ८९८.१२ हेक्टर आर जमिनीत रोवणी झाली आहे. म्हणजे ३.११ टक्केच रोवणी झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात मोहाडी मंडळात ५२.१, आंधळगाव ३२.१, कांद्री २३.८, वरठी १४५, कान्हळगाव १७.२ व करडी मंडळात १२५.८ मि.मी. पाऊस पडला होता. तरयावर्षी मोहाडी १९३.१, आंधळगाव ९२.३, कांद्री १११.७, वरठी १७०.२, कान्हळगाव ६५ व करडी येथे १७७.६ मि.मी. पाऊस पडला. तसेच १ जुलै ते १० जुलै पर्यंत मोहाडी मंडळात यावर्षी ३२२.८ आंधळगाव १०१.७, कांद्री १०५.३, वरठी ३१५.६, कान्हळगाव १८४.६, करडी ३१६.४ मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी याच तारखेस मोहाडी मंडळात ११५.३, आंधळगाव ५०.९, कांद्री ५१.५, वरठी २६२.२, कान्हळगाव ९३ व करडी येथे ६६.२ मि.मी. असा पाऊस झाला होता. मोहाडी, वरठी, करडी मंडळात बºयापैकी पाऊस झाला. याच भागात मंदगतीने रोवणीला प्रारंभ झाला आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने ६ हजार ५७१ भात पिकाची जमीन पडीत राहिली. मागील वर्षी मोहाडी तालुक्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत भातपिकाची लागवड झाल्यास उत्पादन समाधानकारक येतो पण, पावसा अभावी रोवणी सप्टेंबर गेली तर भात उत्पादनावर फरक पडत असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाने दिली. २० जुलै रोजी पुष्य नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्रात पावसाला म्हातारा पाऊस म्हटले जातो. या नक्षत्रात शेतीत जोरदार पाऊस पडावा यासाठी पर्जन्यदेवाकडे शेतकरी मोठी आस घेवून बसला आहे. मृग नक्षत्रात अनेकांनी शेतामध्ये नांगर, ट्रॅक्टर चालविला. चिराटा केला गेला. पाऊस खूप आला तर चिखलणीसाठी जमीन तयार करण्यात आली. आता सारी भिस्त वरुण राजावर आहे. त्यासाठीच येरे येरे पावसा, मोहाडी तालुक्यावर रुसलास कसा अशी आर्त साद वरूणराजाला करीत आहे.