शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

येरे येरे पावसा, मोहाडीवर रुसलास कसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:59 IST

आकडेमोडीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे आकडे बरे आहेत. इतर तालुक्याच्या तुलनेत मोहाडीवर पावसाची अवकृपा आहे. खरीपाच्या भात लावणीचा हंगाम जोरात असताना अनेक शेत कोरडीच दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी ये रे ये रे पावसा, मोहाडीवर रुसलास कसा, अशी आर्त साद वरुणराजाला घालत आहेत.

ठळक मुद्देहंगाम खरीपाचा : ८९२ हेक्टर रोवणी, अनेक शेत कोरडेच

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : आकडेमोडीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे आकडे बरे आहेत. इतर तालुक्याच्या तुलनेत मोहाडीवर पावसाची अवकृपा आहे. खरीपाच्या भात लावणीचा हंगाम जोरात असताना अनेक शेत कोरडीच दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी ये रे ये रे पावसा, मोहाडीवर रुसलास कसा, अशी आर्त साद वरुणराजाला घालत आहेत.यावर्षी अनुकुल पर्जन्यवृष्टी होईल असा तर्क बांधण्यात आला होता. लगतच्या नागपूर जिल्ह्यात शहरात पूर आला. तसेच भंडारा जिल्ह्यातही सहाही तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. पण मोहाडी तालुक्यात वरुण राजाने बळीराजावर वक्रदृष्टी केली आहे. पावसाअभावी उशिरा भात पिकाचे रोपे घालण्यात आली. रोपांना जीवंत ठेवण्याएवढा पाऊस झाला. रोपे आता रोवणीसाठी यायला लागली. परंतु अनेक शेतकºयांची जमीन कोरडीच दिसून येत आहे. पुनर्वसू पावसाचा नक्षत्र संपायला एक आठवडा शिल्लक आहे. या अगोदर रोहणी, मृग, आद्रा ही पावसाची नक्षत्र निघून गेली आहेत. पर्यन्य योग, उपयुक्त पाऊस पडण्याची एवढी आशा शिल्लक आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकºयांनीच धान पिकाच्या रोवणीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत २८ हजार ८६४ हेक्टर आर भात पिकाच्या क्षेत्रापैकी केवळ ८९८.१२ हेक्टर आर जमिनीत रोवणी झाली आहे. म्हणजे ३.११ टक्केच रोवणी झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात मोहाडी मंडळात ५२.१, आंधळगाव ३२.१, कांद्री २३.८, वरठी १४५, कान्हळगाव १७.२ व करडी मंडळात १२५.८ मि.मी. पाऊस पडला होता. तरयावर्षी मोहाडी १९३.१, आंधळगाव ९२.३, कांद्री १११.७, वरठी १७०.२, कान्हळगाव ६५ व करडी येथे १७७.६ मि.मी. पाऊस पडला. तसेच १ जुलै ते १० जुलै पर्यंत मोहाडी मंडळात यावर्षी ३२२.८ आंधळगाव १०१.७, कांद्री १०५.३, वरठी ३१५.६, कान्हळगाव १८४.६, करडी ३१६.४ मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी याच तारखेस मोहाडी मंडळात ११५.३, आंधळगाव ५०.९, कांद्री ५१.५, वरठी २६२.२, कान्हळगाव ९३ व करडी येथे ६६.२ मि.मी. असा पाऊस झाला होता. मोहाडी, वरठी, करडी मंडळात बºयापैकी पाऊस झाला. याच भागात मंदगतीने रोवणीला प्रारंभ झाला आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने ६ हजार ५७१ भात पिकाची जमीन पडीत राहिली. मागील वर्षी मोहाडी तालुक्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत भातपिकाची लागवड झाल्यास उत्पादन समाधानकारक येतो पण, पावसा अभावी रोवणी सप्टेंबर गेली तर भात उत्पादनावर फरक पडत असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाने दिली. २० जुलै रोजी पुष्य नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्रात पावसाला म्हातारा पाऊस म्हटले जातो. या नक्षत्रात शेतीत जोरदार पाऊस पडावा यासाठी पर्जन्यदेवाकडे शेतकरी मोठी आस घेवून बसला आहे. मृग नक्षत्रात अनेकांनी शेतामध्ये नांगर, ट्रॅक्टर चालविला. चिराटा केला गेला. पाऊस खूप आला तर चिखलणीसाठी जमीन तयार करण्यात आली. आता सारी भिस्त वरुण राजावर आहे. त्यासाठीच येरे येरे पावसा, मोहाडी तालुक्यावर रुसलास कसा अशी आर्त साद वरूणराजाला करीत आहे.