शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

यावर्षी धानाचे उत्पादन घटणार

By admin | Updated: November 8, 2014 00:51 IST

मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरडा दुष्काळ यामुळे यावर्षी धानाचे उत्पादन निम्यावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.

साकोली : मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरडा दुष्काळ यामुळे यावर्षी धानाचे उत्पादन निम्यावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. शासनाने तात्काळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिक वाहून गेल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या दुष्काळग्रस्त शेतकरी सावरत नाही तोच यावर्षी पुन्हा निसर्गाने कमाल केली. यावर्षी पावसाने दगा दिला. त्यामुळे याहीवर्षी कर्ज फेडीची समस्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर राहणार आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाची मोठी समस्या असल्यामुळे या शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबुन राहावे लागते.यावर्षी जुन व जुलै महिन्यात मान्सूनचे पाठ फिरविली त्यामुळे पऱ्हे कोमजली. काही गावात दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरवातीचा लागवड खर्च दुबार करावा लागला. आॅगस्ट महिन्यातही पाऊ स समाधानकारक न आल्याने शेतकऱ्यांना पऱ्हे जगविण्यासाठी कमालीची कसरत करावी लागली. शेतकऱ्यांनी यावेळी टॅकरच्या सहाय्याने पाणी देऊ न पऱ्हे कसेमसे जगविले व रोवणीला सुरवात केली तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या थोड्या फार पावसाचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी नक्कीच झाला. मात्र यानंतर सिंचनाची अपूरी सोय ढगाळ वातावरणाचा पिकांवर होणारा परिणाम किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उपाययोजना कराव्या लागल्या. आॅक्टोबर महिन्यात काही भागात धानकापनीला सुरवात केली तेव्हा अचानक पावसाचे हजेरी लावून त्याचे नुकसान केले पाहिजे त्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने धान्याच्या लोबींतील दाणेही भरले नाही. त्यामुळे अधिक पिकांची आशा बाळगणाचा शेतकऱ्यांना निराशा होत आहे. त्यामुळे शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)