शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शौचालय बांधकामासाठी कार्यशाळा

By admin | Updated: June 15, 2014 23:23 IST

प्रत्येक लाभार्थ्याकडे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करुन त्याचा वापर व व्यवस्थापन करण्यात यावा, ग्रामस्तरावर शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता नियोजन, अंमलबजावणी करण्यात यावी,

भंडारा : प्रत्येक लाभार्थ्याकडे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करुन त्याचा वापर व व्यवस्थापन करण्यात यावा, ग्रामस्तरावर शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता नियोजन, अंमलबजावणी करण्यात यावी, याकरिता जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच-उपसरपंच यांची कार्यशाळा नुकतीच जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली.सन २०१४-१५ या वर्षात निर्मल भारत अभियानाच्या वार्षिक कृती आराखड्यात ७२ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक लाभार्थ्याकडे सोपा संडासचे बांधकाम करुन त्याचा वापर व व्यवस्थापन लाभार्थ्यांनी करावयाचे आहे. सदर ग्रामपंचायतमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावे, ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करुन तांत्रिकदृष्ट्या बांधकाम करावे, याकरीता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांचे मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मंजुषा ठवकर यांचे नेतृत्वात कार्यशाळेचे उद्घाटन रवींद्र जावळे यांचे हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रम व्यवस्थापक डी.एस. बिसेन, क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापूरे, पाणी गुणवत्ता निरीक्षक डॉ.मस्के व अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी रवींद्र जावळे यांनी शौचालयाचे प्रकार, तांत्रिकदृष्ट्या करावयाचे बांधकाम, वैयक्तिक शौचालयाचा आराखडा, बांधकामानंतर त्याचा वापर, सार्वजनिक, शाळा, अंगणवाडी येथील शौचालयाचे प्रकार, बांधकाम वापर व व्यवस्थापन यासोबतच शौचालयाची गरज, शौचालयाअभावी गावात होणारी अस्वच्छता, आरोग्यावर होणारा परिणाम, घ्यावयाची काळजी आदी विषयावर माहिती दिली. यावेळी सरपंच, उपसरपंच यांनी शौचालयाबाबतचे अनेक प्रश्न विचारुन शंकांचे निरसन करुन घेतले. वैयक्तिक शौचालयाकरीता मिळणारा प्रोत्साहन निधी, मिळण्याची प्रक्रिया, ग्रामपंचायतीसोबत रोजगार सेवक यांची भूमिका व जबाबदारी याबाबत कार्यक्रम व्यवस्थापन डी.एस. बिसेन यांनी मार्गदर्शन केले. अजय गजापूरे यांनी निर्मल भारत अभियानांतर्गत असणाऱ्या वैयक्तिक शौचालय व इतर कार्यकमाची माहिती दिली. राजेश्वर येरणे यांनी ग्राम पंचायत स्तरावर शौचालयाचे बांधकाम करताना पुरुषांसोबत महिलांचा सहभाग वाढविण्याकरीता ग्रामस्तरीय संवाद उपक्रमाची अंमलबजावणी कशी करावयाची याबाबत वेगवेगळे उदाहरणे देऊन पटवून दिले. गजानन भेदे यांनी शौचालयाचे मॉडेल दाखवून त्यांच्या वेगवेगळ्या भागांची कार्य समजावून सांगितले. पाणी गुणवत्ता निरीक्षक डॉ. मस्के यांनी गावात पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता राखण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत सरपंच व उपसरपंच यांनी मार्गदर्शक-सल्लागार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन ग्रामस्तरीय नियोजनाद्वारे वेळेत बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार केला. संचालन व आभार निलिमा जवादे यांनी केले. कार्यक्रमाकरीता सुशांत ढोके, बबन येरणे, उषा वाडीभस्मे, सरोज वासनिक, भूषण मुळे, देवेंद्र खांडेकर, दुष्यंत सेलोकर आदींनी परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)