शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:02 IST

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.

ठळक मुद्देलाखनी तालुका कचेरीत शुकशुकाट : अनेकांना कामाविनाच परतावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची जनतेला माहिती नसल्यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात आलेल्यांना आल्यापावली गावाकडे परत जावे लागले. या आंदोलनाने जनतेची गैरसोय होणार असल्याने लवकारात लवकर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.दहावी व बारावीचे निकाल लागलेले असल्यामुुळे पुढील इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणतपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शिष्यवृत्तीकरिता हलफनामा या महत्वाच्या दस्ताऐवजांची आवश्यकता आहे. लाखनी तालुक्यात ७१ ग्रामपंचायती आणि एक नगर पंचायत असून १०४ गावे समाविष्ट आहेत. त्यात १० रिठी आणि ९४ लोकवस्तीची असून लोकसंख्या एक लाख २८ हजार ७७६ एवढी आहे.महसूल विभागाचे कामकाज योग्य पध्दतीने व्हावे, याकरिता पाच मंडळ अधिकारी कार्यालये व ३९ तलाठी साझे आहेत. यातून जनतेच्या महसूल विषयक समस्या मार्गी लावल्या जातात. या कार्यालयाचे अधीकार क्षेत्रात नसलेली कामे याच कार्यालयाच्या कागदपत्राच्या पुराव्यावरुन तहसील कार्यालयातून केली जातात. पण महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारा दहा जुलैपासून आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला.या आंदोलनाची जनतेला माहिती नसल्यामुळे तालुक्याचे ग्रामीण भागातून अनेक जण कामानिमित्त तहसील कार्यालयात आले. पण कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित होते. तथा प्रत्येक विभागाचे दर्शनी भागावर आंदोलनाच्या दिनांकाची सुचना करुन गैरसोयीबाबत जनतेस दिलगीरी व्यक्त करण्यात आली होती.नागपूर विद्यापिठाद्वारे पदवी परीक्षाचे निकाल घोषीत होणार असल्यामुळे पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी हे आंदोलन दिर्घकाळ चालल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. शासनाने महसूल कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करुन तोडगा काढावा व जनतेची गैरसोय थांबवावी, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार