शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:02 IST

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.

ठळक मुद्देलाखनी तालुका कचेरीत शुकशुकाट : अनेकांना कामाविनाच परतावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची जनतेला माहिती नसल्यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात आलेल्यांना आल्यापावली गावाकडे परत जावे लागले. या आंदोलनाने जनतेची गैरसोय होणार असल्याने लवकारात लवकर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.दहावी व बारावीचे निकाल लागलेले असल्यामुुळे पुढील इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणतपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शिष्यवृत्तीकरिता हलफनामा या महत्वाच्या दस्ताऐवजांची आवश्यकता आहे. लाखनी तालुक्यात ७१ ग्रामपंचायती आणि एक नगर पंचायत असून १०४ गावे समाविष्ट आहेत. त्यात १० रिठी आणि ९४ लोकवस्तीची असून लोकसंख्या एक लाख २८ हजार ७७६ एवढी आहे.महसूल विभागाचे कामकाज योग्य पध्दतीने व्हावे, याकरिता पाच मंडळ अधिकारी कार्यालये व ३९ तलाठी साझे आहेत. यातून जनतेच्या महसूल विषयक समस्या मार्गी लावल्या जातात. या कार्यालयाचे अधीकार क्षेत्रात नसलेली कामे याच कार्यालयाच्या कागदपत्राच्या पुराव्यावरुन तहसील कार्यालयातून केली जातात. पण महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारा दहा जुलैपासून आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला.या आंदोलनाची जनतेला माहिती नसल्यामुळे तालुक्याचे ग्रामीण भागातून अनेक जण कामानिमित्त तहसील कार्यालयात आले. पण कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित होते. तथा प्रत्येक विभागाचे दर्शनी भागावर आंदोलनाच्या दिनांकाची सुचना करुन गैरसोयीबाबत जनतेस दिलगीरी व्यक्त करण्यात आली होती.नागपूर विद्यापिठाद्वारे पदवी परीक्षाचे निकाल घोषीत होणार असल्यामुळे पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी हे आंदोलन दिर्घकाळ चालल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. शासनाने महसूल कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करुन तोडगा काढावा व जनतेची गैरसोय थांबवावी, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार