शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:02 IST

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.

ठळक मुद्देलाखनी तालुका कचेरीत शुकशुकाट : अनेकांना कामाविनाच परतावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची जनतेला माहिती नसल्यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात आलेल्यांना आल्यापावली गावाकडे परत जावे लागले. या आंदोलनाने जनतेची गैरसोय होणार असल्याने लवकारात लवकर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.दहावी व बारावीचे निकाल लागलेले असल्यामुुळे पुढील इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणतपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शिष्यवृत्तीकरिता हलफनामा या महत्वाच्या दस्ताऐवजांची आवश्यकता आहे. लाखनी तालुक्यात ७१ ग्रामपंचायती आणि एक नगर पंचायत असून १०४ गावे समाविष्ट आहेत. त्यात १० रिठी आणि ९४ लोकवस्तीची असून लोकसंख्या एक लाख २८ हजार ७७६ एवढी आहे.महसूल विभागाचे कामकाज योग्य पध्दतीने व्हावे, याकरिता पाच मंडळ अधिकारी कार्यालये व ३९ तलाठी साझे आहेत. यातून जनतेच्या महसूल विषयक समस्या मार्गी लावल्या जातात. या कार्यालयाचे अधीकार क्षेत्रात नसलेली कामे याच कार्यालयाच्या कागदपत्राच्या पुराव्यावरुन तहसील कार्यालयातून केली जातात. पण महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारा दहा जुलैपासून आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला.या आंदोलनाची जनतेला माहिती नसल्यामुळे तालुक्याचे ग्रामीण भागातून अनेक जण कामानिमित्त तहसील कार्यालयात आले. पण कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित होते. तथा प्रत्येक विभागाचे दर्शनी भागावर आंदोलनाच्या दिनांकाची सुचना करुन गैरसोयीबाबत जनतेस दिलगीरी व्यक्त करण्यात आली होती.नागपूर विद्यापिठाद्वारे पदवी परीक्षाचे निकाल घोषीत होणार असल्यामुळे पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी हे आंदोलन दिर्घकाळ चालल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. शासनाने महसूल कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करुन तोडगा काढावा व जनतेची गैरसोय थांबवावी, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार