शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

तिरोडा-कटंगी रेल्वे मार्गाचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

इंग्रजांच्या काळात रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. तिरोडीपर्यंत रेल्वेचे कामही झाले. त्यानंतर उत्तर भारताशी जोडणाऱ्या कटंगी मार्गाची मागणी पुढे येवू लागली. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. १३ जून २०११ तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री कमलनाथ यांच्या हस्ते या मार्गाचा शिलान्यास करण्यात आला. त्यानंतर काम पुन्हा रखडले.

ठळक मुद्देसात दशकांपासून मागणी : उत्तर भारतात जाणारा जवळचा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तिरोडी ते कटंगी या रेल्वे मार्गाचे बांधकाम गत सात दशकांपासून अपूर्ण आहे. केवळ १५.९ किमीचा ट्रॅक पूर्णत्वास आला तर उत्तर भारतात जाण्यासाठी जवळचा आणि सोईचा मार्ग ठरणार आहे. गत दोन वर्षांपासून सुरु असलेले काम अतिशय संथगतीने सुरु आहे.इंग्रजांच्या काळात रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. तिरोडीपर्यंत रेल्वेचे कामही झाले. त्यानंतर उत्तर भारताशी जोडणाऱ्या कटंगी मार्गाची मागणी पुढे येवू लागली. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. १३ जून २०११ तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री कमलनाथ यांच्या हस्ते या मार्गाचा शिलान्यास करण्यात आला. त्यानंतर काम पुन्हा रखडले. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी रेल्वे ट्रॅकच्या बांधकामाचे पुन्हा भूमिपुजन खासदार बोधसिंग भगत यांच्याहस्ते करण्यात आले. दोन वर्षात हा रेल्वे मार्ग पुर्ण होईल असे सांगण्यात आले. परंतु बांधकामाची गती संत असल्याने २०२० पर्यंत काम पूर्ण होण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाही.तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाचे अंतर १५.९ किमी आहे. यासाठी १८६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ६९.३८ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. या मार्गावर सहा मोठे पुल, २४ लहान पुल, १३ रस्त्यावरील पुल बांधण्यात येणार आहे. पोनिया या रल्वे स्थानकावर नव्याने बांधकाम केले जाणार आहे.नागपूर-कटंगी-जबलपूर मार्गतिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे बांधकाम पुर्ण झाल्यावर नागपूर - कटंगी - जबलपूर असा रेल्वे मार्ग निर्माण होणार आहे. त्यामुळे उत्तर व दक्षिण भारतात जाणाºया प्रमुख रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे. कटंगी- बालाघाट- जबलपूर हा रेल्वे पुर्वीपासून अस्तित्वात आहे. केवळ तिरोडी-कटंगी रेल्वेचे काम तेवढे रखडले आहे. तुमसर रोड ते तिरोडीचे अंतर ४६.८३ किमी आहे. यात सात रेल्वेस्थानक आहे. याकरिता रेल्वेगाडीला एक तास २० मिनिटे लागतात. नवीन रेल्वेमार्गामुळे मध्यप्रदेशासोबत व्यापार, शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे