शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

विस्मृतीत गेलेला स्वाभिमान जागविण्याचे संघाचे कार्य

By admin | Updated: October 27, 2015 00:44 IST

बळ, साहस, शस्त्र असे सर्वकाही असताना आम्ही गुलामगिरीत होतो. कुणीतरी येऊन जातो.

शस्त्रपूजन उत्सव : जितेंद्रनाथ महाराज यांचे प्रतिपादनभंडारा : बळ, साहस, शस्त्र असे सर्वकाही असताना आम्ही गुलामगिरीत होतो. कुणीतरी येऊन जातो. पंथ, धर्माच्या आधारे फुट पाडून गुलामासारखे वागवितो. आम्ही आमचा इतिहास विसरलो. हेच या मागचे मुळ कारण आहे. शस्त्र, बळ आणि साहस असतानाही आम्ही वर्षानुवर्ष गुलामगिरीत काढले. उपहास सहन करीत राहिलो. विस्मरणात गेलेला बलीदानाचा इतिहास, स्वाभिमान जागविण्याचा मंत्र संघाने दिला. संघाची विचारधारा ईश्वरनिर्मित असून याच विचारधारेवर देशाची अवस्था अवलंबून आहे. जे इतिहासात चुकले ते भविष्यात चुकू देऊ नका. असा सल्ला अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज यांनी दिला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भंडारा नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव रविवारला सहकारनगर मैदानावर झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उद्योगपती रामविलास सारडा, जिल्हा संघचालक राम चाचेरे, नगर संघचालक अनिल मेहर उपस्थित होते. तत्पूर्वी अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन झाल्यानंतर स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिके सादर केले. यावेळी सारडा म्हणाले, त्यागात मोठी शक्ती असते. संघ आणि स्वयंसेवक त्यागातून धर्म रक्षणासाठी सदैव अग्रेसर आहेत. त्यामुळे हे कार्य ईश्वरीय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, संघ एक शक्ती आहे. स्वातंत्रपूर्व काळापासून संघाचे कार्य सुरु आहे. त्यामुळे संघाची नाळ राजकारणाशी कुणी जोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे ठरेल. देव, देश आणि धर्मासाठी संघशक्ती झगडत आहे. कार्य करीत आहे. ‘हास’ दोन प्रकारचे असतात. ज्याच्या भरवशावर स्वाभीमान राखला जातो तो इतिहास अन् स्वाभीमान गमावला जातो तो उपहास. आम्ही वर्षानुवर्षे उपहासात जगलो. वेद, उपनिषद संतांची वचने गुरुगोविंद सिंहाचा पराक्रम आम्ही विसरलो. स्वाभीमानाचा मृत्यू झाला, अन् वैभवशाली परंपरेवर आघात झाले. पाठीशी असलेला इतिहास सांगण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून डॉ.हेडगेवार यांनी केले. संघाचा इतिहास वाचल्याशिवाय कुणीही संघाबद्दल वक्तव्य करीत असेल तर तो भारत मातेशी केलेला अप्रामाणिकपणा असेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्रीपाद थोटे यांनी सुभाषित, रोशन भुरे यांनी अमृतवचन तर तिलक निंबेकर यांनी वैयक्तिक गीत गायले. परिचय शेखर पांडे यांनी करून दिला. (जिल्हा प्रतिनिधी)