शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

कोरोना काळातील ग्रामीण स्तरावरील कर्मचाऱ्यांचे कार्य उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

आजही कोरोना काळात शासनाच्या ५० लाख विमा योजनेच्या संरक्षणासाठी वीज कर्मचारी, कृषी कर्मचारी यांना संघर्षच करावा लागत आहे. त्यामुळे ...

आजही कोरोना काळात शासनाच्या ५० लाख विमा योजनेच्या संरक्षणासाठी वीज कर्मचारी, कृषी कर्मचारी यांना संघर्षच करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण पातळीवर एकत्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करू नये, तसेच सर्वांनाच सरसकट विमा योजनेचा लाभ देऊन सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्याची गरज आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने कृषी कर्मचारी दररोज हजाराे शेतकऱ्यांच्या संपर्कात येत आहेत. वीज कर्मचाऱ्यांनीही आपला जीव धोक्यात घालून कुठेही वीज पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आपले कर्तव्य निभावले आहे. मात्र, शासन मात्र स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांच्या हक्काचे कर्मचारी कृषी सहायक, तलाठीच

जिल्ह्यात कोरोना धोका वाढला आहे. मात्र, खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांची खरिपासाठी धावपळ सुरू आहे. त्यामुळे पीक कर्ज असो की खरिपातील खते, बियाणे व पीक पद्धती बदलाविषयी मार्गदर्शन असो शेतकऱ्यांसाठी कोणतेही काम असो ग्रामीण स्तरावर काम करणारे तलाठी, कृषी सहायक हेच शेतकऱ्यांसाठी आजही कोरोना काळातही हक्काचे कर्मचारी आहेत. आज अनेक तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक हे कोरोनाने संक्रमित झाले असून ते आपल्या कुटुंबासह स्वतःचा जीव धोक्यात घालून तरीही कर्तव्य निभावतच आहेत. मात्र, वरिष्ठ स्तरावर याच कृषी सहायक व वीज कर्मचाऱ्यांना तात्काळ शासनाने विम्याचा लाभ देण्याची गरज आहे.

कोट

ग्रामीण पातळीवर कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, वीज कर्मचारी एकमेकांच्या समन्वयातून एकत्रित कामे करतात. शासनाने मात्र तलाठी, ग्रामसेवकांना कोविड काळात ५० लाखांच्या विम्याचा लाभ दिला आहे. मात्र, शासन कृषी कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे. अनेक कृषी कर्मचारी आज मृत्यूशी झुंज देत आहेत. खरीप हंगामातील कोरोनाचा धोका लक्षात घेऊन तात्काळ विम्याचा लाभ दिलाच पाहिजे.

-गणेश शेंडे,

कृषी पर्यवेक्षक, लाखनी