शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 17:28 IST

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतींवर हल्लाबोल आंदोलन करीत अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देमहिलांच्या आंदोलनानंतर दारू विक्रेत्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

भंडारा : गत पाच ते सहा महिन्यांपासून गावातीलच दोन व्यक्तींकडून अवैधरीत्या दारू विक्रीचा व्यवसाय केला जात असल्यामुळे गावात नेहमीच मद्यपींकडून धिंगाणा केला जायचा, अनेकांचे संसार मोडण्याच्या मार्गावर आले होते. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतींवर हल्लाबोल आंदोलन करीत अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना गुरूवारी लाखांदूर तालुक्यातील पालेपेंढरी येथे घडली.

तालुक्यातील पालेपेंढरी या छोट्याशा गावातील नागरिक गुण्या-गोविंदाने नांदत असताना गत पाच ते सहा महिन्यांपासून गावातील बालक कोंडी पिल्लेवान (४०) व सवितराव वसंतराव पिल्लेवान (२७) यांनी गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. गावातच दारू मिळत असल्यामुळे गावात मद्यपी सकाळपासूनच दारू ढोसासचे. त्यांच्यामुळे अनेकांचे संसार विस्कटण्याच्या मार्गावर आले होते. त्यामुळे गावातील महिला बचट गटांनी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडे दारू बंदीची मागणी केली होती. महिलांच्या मागणीनुसार सरपंच वर्षा नरुले यांनी ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत दारू बंदीकरिता एकमताने ठराव पारीत करून पालांदूर पोलिसांकडे सादर केला होता. मात्र गावातील दारू बंद न होता खुलेआम विक्री व्यवसाय सुरूच होता.

दरम्यान, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून केलेल्या मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळे गुरुवारी गावातील बचत गटाच्या महिला व उपसरपंच भोजराज नान्हे यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना गावापासून दूर काही अंतरावर रंगेहात पकडून स्थानिक ग्रामपंचायत कार्यावर हल्लाबोल आंदोलन केले. यानंतर महिलांनी दारू विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दारू विक्रेत्यांना पोलीस अटक करीत नाहीत. तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोरून हलणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला होता. त्यामुळे सरपंच वर्षा नरुले, ग्रामसेविका लिमजे यांनी पालांदूर पोलीसांशी संपर्क साधून तत्काळ येऊन अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार ठाणेदार सावंत यांनी घटनास्थळ गाठून दोन पेटी दारूसह दोन्ही दारू विक्रेत्यांना अटक करून ताब्यात घेतले. दारू बंदी मोहिमेत उपसरपंच भोजराज नान्हे, अमित शिवणकर, लेकराम शिवणकर, योगेश शिवनकर, प्रज्वल शिवणकर, भूषण सेलोटे, चिंतामण मस्के, शुभम शिवणकर, सौरभ शिवणकर,तसेच गावातील महिलांचा सहभाग होता.

टॅग्स :agitationआंदोलनWomenमहिलाalcohol prohibition actदारुबंदी कायदाgram panchayatग्राम पंचायत