शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

महिलांचा सन्मान महिलांच्याच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:05 IST

आजच्या महिला ताणतणावात जीवन जगत आहेत. त्यांच्याकरिता विकासाची गरज आहे. महिलांचा सन्मान महिलांच्याच कार्यकुशलतेने पुढे येऊ शकते त्यासाठी स्वत:चे स्वाभिमान राखताना दुसऱ्यालाही त्यांचे सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक घरातील सासूने सुनेला मुलीसारख वागवावं व सुनेने देखील मुलीसारखं आपल घर समजावे, म्हणजे घरात सुखशांती व आनंद वातावरण निर्माण होईल, असे प्रतिपादन महाथेरी भिक्खुणी विशाखा यांनी काढले.

ठळक मुद्देभिक्खुणी विशाखा यांचे प्रतिपादन : अखिल भारतीय भिक्खुणी परिषद उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजच्या महिला ताणतणावात जीवन जगत आहेत. त्यांच्याकरिता विकासाची गरज आहे. महिलांचा सन्मान महिलांच्याच कार्यकुशलतेने पुढे येऊ शकते त्यासाठी स्वत:चे स्वाभिमान राखताना दुसऱ्यालाही त्यांचे सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक घरातील सासूने सुनेला मुलीसारख वागवावं व सुनेने देखील मुलीसारखं आपल घर समजावे, म्हणजे घरात सुखशांती व आनंद वातावरण निर्माण होईल, असे प्रतिपादन महाथेरी भिक्खुणी विशाखा यांनी काढले.अखिल भारतीय भिक्खुणी परिषद विषय बुध्द धम्म आणि स्त्रियांचा विकास काळाची गरज या कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीमाई ग्रुप आॅफ लेडीज व त्रिरत्न महिला मंडळ सिध्दार्थ विहार डॉ. आंबेडकर वॉर्ड भंडारा यांच्या सौजन्याने घेण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भिक्षुणी धम्मसुध्दा, भिक्षुणी उत्तरा, भिक्षुणी कात्यायनी, भिक्षुणी शिलाजीता, सुनिती, भिक्षुणी मैत्रीया, भिक्षुणी विशुध्दी आदी उपस्थित होते.भिक्खुणी संघ हा वेगवेगळ्या शहरातून नागपूरहून एकत्र आल्यात. त्रिरत्न महिला मंडळ सिध्दार्थ विहार डॉ. आंबेडकर वॉर्ड भंडारा येथे प्रस्थान झाले. तेथे भिक्षुणी संघाचे स्वागत होऊन त्रिरत्न महिला मंडळाच्यावतीने भोजनदान देण्यात आले. सिध्दार्थ विहार डॉ. आंबेडकर वॉर्ड भंडारा ते सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे धम्म रॅली काढण्यात आली. तेथे भिक्षुणी संघाचे स्वागत साधना इलमकर व साक्षी शिंपोलकर यांच्या गिताने करण्यात आले. संघाच्या प्रमुख भिक्षुणी महाथेरी विशाखा यांचे हस्ते करण्यात आले. सामूहिक वंदना याप्रसंगी एकुण २८ भिक्षुणींचा संघ उपस्थित होता.बुध्दाचा धम्म हा मानव कल्याणाचा धम्म आहे. म्हणून स्त्रियांनी धम्माला समजून त्याप्रमाणे सदाचरण करावे. शीलाचे पालन करावे. बंधुभाव ठेवावा, स्वत: सुखी व्हावे व दुसºयालाही सुखी बनवावे, कुशल कर्म केल्याने त्याचे फळ चांगले मिळते. यासाठी नैतिक व्यवस्था चांगली असावी, असे प्रतिपादन महाथेरी कात्यायनी यांनी केले.भिक्षुणी विनयशिला यांनी यशोधरा व प्रजापती गौतमी यांनी धम्मात जे योगदान दिले त्यावर प्रकाश टाकला. आजच्या युगातील स्त्री सर्व क्षेत्रात समोर गेली असेल तरी सुध्दा काही स्त्रियांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही असे भिक्षुणी मैत्रिया यांनी सांगितले.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शालिनी कोचे, डॉ. स्नेहा राऊत, सीमा बन्सोड, पविता पाटील, सारंगा वाघमारे, पुष्पा मेश्राम, भाविका उके, माजी सभापती माया उके आहेत.परिषदेसाठी आशा कवाडे , निर्मला उके, सचिन बागडे, न.प. उपाध्यक्ष आशु गोंडाणे, माया उके, न.प. बांधकाम समिती साधना त्रिवेणी, नरेंद्र बन्सोड, अभिजित बागडे, व्ही. डी. बारमाटे, विद्या नागदेवे, दिपक पाटील, मनोहर वाघमारे, शैलेंद्र गजभिये, देवा मेश्राम, राहुल बडोले यांच्यासह लीला रामटेके, महानंदा गजभिये, आशा देशभ्रतार, विजु वासनिक, विरांगणा बागडे, विजयकांता रामटेके, मंगला सतदेवे, कुंदा गजभिये, अल्का सतदेवे, चित्रा गेडाम, कपिला रामटेके, सुचिता गजभिये, पविता पाटील यांनी सहकार्य केले.प्रास्ताविक भाषण भाविका उके, संचालन डॉ. स्नेहा राऊत व वैभवी पाटील यांनी तर, आभार प्रदर्शन शालिनी कोचे यांनी केले.