शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी गाजविली ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:25 IST

गावाचा विकास करणे आणि गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामसभांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देठाणा येथे महिलांची एकजूट : दारूबंदी करण्यासाठी महिला सरसावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : गावाचा विकास करणे आणि गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामसभांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने गावातील महिलांनी ठाणा ग्रामसभेत प्रथमच मोठ्या संख्येने हजेरी लावून न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करण्यासाठी प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर ठराव संमत करीत ग्रामसभा गाजविली. शेवटपर्यंत प्रश्न विचारत एकाही पुरूषांना बोलण्याची वेळ येऊ दिली नाही हे विशेष.एरव्ही ग्रामसभा म्हटले की, पहिली सभा कोरमअभावी तहकुब होते. पुढील तहकुब सभेत आपल्याच विचाराच्या दोनचार जणांना घेऊन तहकुब सभेत विविध कामांना मंजूर घेत असतात. ठाणा पेट्रोलपंप येथे यावेळी वेगळेच पाहावयास मिळाले. येथील महिला राजसत्ता आंदोलन समितीने चंग बांधून ग्रामसभेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यानुसार महिला सभागृहात उपस्थित झाले.प्रथम महिलांची सभा झाली. तिथे महिलांनी समस्या मांडल्या. त्यानंतर गावातील इतर नागरिक ग्रामसभेला उपस्थित झाले. सभागृह अपुरे पडल्याने ग्रामपंचायत आवारात सभा घेण्यात आली. यातही महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नवनिर्वाचित सरपंच सुषमा पवार या सभाध्यक्ष होत्या. विषयसुचीनुसार सभेला सुरुवात झाली.ग्रामपंचायतचे सन २०१८-१९ चे वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यात आले. शासकीय परिपत्रकाचे वाचन केले. यात जनसेवकाची निवड करण्यात आली. यातही महिलांनी बाजी मारली. येथे फरजाना शेख यांची निवड केली. ठाणा येथे कब्रस्तानकरीता जागा देण्याची मागणी संत नरहरी महाराज परिसराचे सौंदर्यीकरण करणे, नवीन आनंद बुद्ध विहार परिसराचा विकास करणे व दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. १.७० कोटी रूपयांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाची चौकशी करून योजना सुरू करा.सरपंचांनी घोषणापत्रात नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायततर्फे ५ रूपयांचे भोजन सुरू करण्यासंबंधी प्रश्नाचे उत्तर मागितले. सभाध्यक्ष व सचिवांना विकासात्मक बाबीवर धारेवर धरले. ठराव संमत करून घोषणा करण्यासाठी बाध्य केले. गावाच्या विकासासाठी महिला ग्रामसभेत सातत्याने आल्यास गावाचा चौफेर विकास होईल, असे महिला राजसत्ता आंदोलन समितीने म्हटले आहे.