शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

पाण्यासाठी महिलांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:36 IST

शहरातील प्रभाग १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्रभागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात यावा याकरीता नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर रोजी भंडारा नगर परिषदेवर महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देप्रकरण प्रभाग क्रमांक १४ मधील : आठ दिवसात पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील प्रभाग १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्रभागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात यावा याकरीता नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर रोजी भंडारा नगर परिषदेवर महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगर परिषद प्रशासनाने एका आठवड्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.प्रभाग १४ मध्ये मोठया प्रमाणात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे ते खाजगी नळ घेऊ शकत नाही. या वॉर्डात सार्वजनिक नळ हे बोटावर मोजण्या इतके आहेत. येथील अनेक नळावर दुगंधीर्युक्त पाणी वाहत असते. त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे.नवीन पाणीपुरवठा योजनेला अंतिम स्वरूपात येण्यासाठी अजून बराच कालावधी शिल्लक असतांना तोपर्यंत नागरिकांना पाण्याविना ठेवणार काय? असा सवाल यावेळी नगरसेवक नितीन धकाते यांनी प्रशासनाला विचारला.यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष आशु गोंडाणे, उपमुख्याधिकारी कळंबे यांना नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात वार्ड वासियांनी निवेदन सादर केले. निवेदन देताना सदानंद धकाते, रेणुका धकाते, भाजीखाये, निळकंठ धकाते, संदीप कुंभारे, देवेंद्र कोहाड, सुरेश कोहाड, मीना खेताडे, चंदा हेडाऊ व वाडार्तील पुरुष, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.शहरातील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही फार जुनी असुन पुर्णपणे जिर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी लिकेज होवून नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. जीर्ण झालेल्या पाईपलाईनचा शोध घेवून ती दुरूस्त करण्याकरीता जवळपास एका आठवडयाचा कालावधी लागेल.तोपर्यंत प्रभागातील नागरिकांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा केला जाईल.-आशिष गोंडाणे, उपाध्यक्ष, न. प. भंडारापावसाळयात नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवने हे नगर पालीका प्रशासनाचे अपयश आहे. येत्या एका आठवड्यात प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन भंडारा नगर परिषदेने दिले आहे. एका आठवडयात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास नगर पालिकेला घेराव घालून नगर परिषद कार्यालयासमोर नगर परिषद प्रशासनाविरोधात घोषणा देत तिव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगर पालीका प्रशासनाची राहिल.-नितीन धकाते, नगरसेवक, भंडारा

टॅग्स :water shortageपाणीटंचाई