शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

गावातील महिलांना प्रगतीचा मार्ग गवसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST

राजू बांते मोहाडी : एकजूट, जिद्द, मेहनत याद्वारे या महिलांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या आता ...

राजू बांते

मोहाडी : एकजूट, जिद्द, मेहनत याद्वारे या महिलांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या आता ख-या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. मेहनतीच्या जोरावर प्रगतीचा मार्ग गवसला आहे.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रांत दिसू लागला आहे. मर्यादित क्षेत्रापुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून समाजात सन्मानाने जगण्याचा मार्गदेखील महिलांनी स्वीकारलेला पाहायला मिळत आहे.

मोहाडी तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत १,७११ महिला बचत गट कार्यरत आहेत. यात १८ हजार ५२२ महिला स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.

महिला बचत गटाच्या माध्यमामधून अनेक महिलांचे संसार उभे राहिले आहेत. त्या महिला आपल्या संसारासाठी हातभार लावत आहेत. २०२०-२०२१ मध्ये सात लक्ष ३१ हजार रक्कम ५७९ महिला बचतसमूहाला कर्जवाटप करण्यात आली आहे. तसेच ९४८ महिला बचत गटसमूहाला १०-१५ हजार खेळते भांडवल प्राप्त करून देण्यात आले आहे. या खेळत्या भांडवलावर आंधळगाव येथे वारली पेंटिंग, करडी येथे बांबू व्यवसाय, वरठी कागदी बाहुल्या, पाचगाव येथे जैविक खत, जैविक गांडूळ, कांद्री येथे बॅग व्यवसाय तसेच दुग्ध व्यवसाय, अगरबत्ती, पापड, मसाले आदी व्यवसाय मोहाडी तालुक्यात महिला बचत गटांमार्फत केले जात आहेत.

अनेक महिलांनी आपले व्यवसाय घरबसल्या सुरू केले आहेत. या सर्व महिलांचे व्यवसाय आता स्थिर झाले आहेत. आंधळगाव येथे तर रेशीम कापडाच्या साड्या करण्याचा व्यवसाय दुर्गा व यशस्वी बचत गटांकडून केला जातो. या बचत गटाने तयार केलेल्या साड्यांना राज्यात व परराज्यांत मागणी आहे. कुरिअरद्वारे आंधळगाव येथील साड्या विविध ठिकाणी पाठविल्या जातात. राज्यात होणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रदर्शनांत आंधळगाव येथील साड्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात.

बचत गटांमुळेच या महिला एकत्र येऊन सुसंवाद साधू लागल्या. परस्परांमध्ये विचारविनिमय करू लागल्या आहेत. त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर सुधारला, याची जाणीव त्यांना आहे. आज या महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. हेच या महिला बचत गटांच्या चळवळीचे यश आहे.

कोट

बचत गटांमुळे आर्थिक कणा सक्षम झाला आहे. प्रगतीच्या दिशेने झेपावणारा आत्मविश्वास वाढलेला आहे.

याकरिता गरज आहे, ती जिद्द व संघर्ष करण्याची, संधीचं सोनं करण्याची.

कांचन निंबार्ते, उपसरपंच, ग्रामपंचायत कान्हळगाव