शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

दीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध होता येणार नाही

By admin | Updated: February 9, 2016 00:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर बौद्ध धम्म स्विकारण्याचे जाहीर केले.

वरठी येथे धम्म प्रवचन : भंदत विमलकीर्ती गुणसारी यांचे प्रतिपादनवरठी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर बौद्ध धम्म स्विकारण्याचे जाहीर केले. स्वत:ला बौद्ध म्हणून न वावरता सर्व प्रथम त्यांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. याचा सरळ अर्थ असा की बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्याशिवाय बौद्ध होता येत नाही. डॉ.आंबेडकर यांच्यानंतर दिक्षा न घेता बौद्ध म्हणून वावरणाऱ्या अनाधिकृत बौद्धामुळे धम्माचा ऱ्हास होत आहे. यामुळे प्रत्येक अनुनायाने बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचे आवाहन भदंत विमलकीर्ती गुणसारी यांनी केले.ते वरठी येथे आयोजीत धम्म प्रवचनात बोलत होते. ते म्हणाले, बौद्ध धम्मात त्रिशरण, पंचशिल यासारखे अंसख्य सुत्तपाठ फार पवित्र आहेत. त्याचे ग्रहण केल्याने माणुस शुद्ध होवून शिलवान बनू शकतो. जीवनात प्रत्येकांना दु:ख आहेत. त्या दु:खाचे निवारण करण्यासाठी दु:ख आहेत. म्हणून चर्चा केल्याने होणार नाही. सामुहीक प्रयत्नाची आवश्यकता आहे. जाती द्वेष, मनुष्य भेद, उच्च विद्वता, वर्ण आणि जाती भेद हे माणुसकीला घातक आहेत. बौद्ध म्हणून वावरणारे पण अजूनही पुर्वाश्रमीचे कर्मकांड करू पाहणाऱ्याची संख्या फार मोठी आहे. जातीद्वेष नष्ट करण्यासाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. बौद्ध धम्माची दीक्षा घेवून पंरपरागत सुरु असलेल्या जात दर्शक आडनाव बदलविणे आवश्यक आहे.मानवी जीवनात चढाओढ, स्पर्धा असतात. यापासून कधी सुख तर कधी दुख: वाट्याला येतात. दुर्लक्षित समाजाच्या वाट्याला आजन्म दुख:च होते. यापासून मुक्त करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. गुलामगिरीतून मुक्त करून सर्वाना समान अधिकार संविधानातून दिले. दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दीले. लढ्याच्या आधारावर प्राप्त झालेल्या सुविधांचा लाभ घेतला.परंतु खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना साथ देण्यात आली नाही. पण बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नाही. बाबासाहेबांना देवाची उपमा दिली पण या देवाचे कुणी ऐकले नाही. त्यांनी उभारलेल्या लढ्याचे अस्तित्व नाकारण्याचे काम केले. स्वार्थी बनण्यापेक्षा दुसऱ्यांचे भले करा, असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलींद रामटेके, माजी जि.प. सदस्य दिलीप उके, किशोर बौद्ध, बुद्धकला फुले, शेखर मडामे, देवदास डोंगरे, कल्याण डोंगरे, शुंभागी गणवीर उपस्थित होते. संचलन रविद्र बोरकर व आभार विवेक गणवीर यांनी मानले. (वार्ताहर)