शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

शिवसेनेच्या आंदोलनामुळे फी वाढ रद्द

By admin | Updated: July 17, 2016 00:24 IST

आंधळगाव येथील जि.प. विद्यालयातील शाळा समितीने अकराव्या वर्गातील प्रवेश घेण्यासाठी फी वाढ केली होती.

आंधळगांव येथील प्रकरण : अकराव्या वर्गाचे प्रवेश शुल्क वाढविले होतेआंधळगाव : आंधळगाव येथील जि.प. विद्यालयातील शाळा समितीने अकराव्या वर्गातील प्रवेश घेण्यासाठी फी वाढ केली होती. या अवाजवी फी वाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन दिनांक १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता विद्यालयासमोर करण्यात आले. फी वाढ रद्द करण्याचा निर्णय प्राचार्य बोळणे यांनी घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील दहावीतून उत्तीर्ण झालेले व बाहेरगावातील बरेचसे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. अकरावी विज्ञान व कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी शाळा समितीने मागील महिन्यात जि.प. सदस्य राणीताई ढेंगे व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश फी मोठी वाढ केली होती. वाढविलेली फी रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या ४ जुलै प्राचार्य बोळणे यांना निवेदन देण्यात आले होते. शासनाच्या परिपत्रकाच्या विरुद्ध शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश फी वाढविली होती. या वाढीव फी च्या विरोधात जि.प. विद्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा उपप्रमुख राजेश बुराडे, तालुका प्रमुख हंसराज आगासे, नरेश उचिबगले तुमसर, पवन चव्हाण, प्रा.देवेंद्र रंभाड, शिवशंकर द्रुगकर, राजू मते इत्यादी उपस्थित होते. वक्त्यांची भाषणे होवून प्राचार्य बोळणे यांना निर्णय मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आली. रस्त्यावरच ठिय्या मांडून शिवसैनिकांनी प्राचार्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. प्राचार्यांनी स्वत: येवून चर्चेसाठी बोलाविले. त्यांच्या कक्षात नायब तहसीलदार थोटे, उपशिक्षणाधिकारी पडोळे, गटशिक्षणाधिकारी गाढवे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजेश बुराडे, शिवशंकर द्रुगकर, देवेंद्र रंभाड, हंसराज आगाशे, नरेश उचिबगले, राजू मते, गोवर्धन मारवाडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक व पदाधिकाऱ्यांनी पालकांची दिशाभूल केली. अतिरिक्त वाढीव तुकडीकरिता शासन कोणतेही वेतन देत नाही, त्यामुळे आम्हाला प्रवेश फी जास्त घ्यावी लागते. चर्चेमध्ये उपशिक्षणाधिकारी पडोळे, गटशिक्षणाधिकारी गाढवे यांनी वाढीव तुकडीकरिता लागणाऱ्या शिक्षकांचे वेतन जि.प. शिक्षण विभागातून होत असते. याकरिता प्रवेश फी वाढ करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मागील वर्षाचे अंदाजे ४० हजार रुपये शिल्लक असल्याने या मधूनच आपल्या शाळेच्या गरजा पूर्ण होत आहे. त्याकरिता प्रवेश फी मध्ये वाढ न करता पाचशे रुपये ठेवण्यात यावे असे ठरविण्यात आले. त्यामुळे वाढविलेली फी रद्द करण्यात आली.आंदोलनाच्या यशस्वितेसाठी धनराज पाटील, भगवान विठोले, केशव कावळे, कैलाश झंझाड, कैलाश शेंडे, नरेश चापरे, दशरथ बोरकर व गावकऱ्यांनी आंदोलनात भाग घेऊन सहकार्य केले. (वार्ताहर)