शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

वैनगंगेत वाहून गेल्यावर गाव उठविणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:34 IST

गोसेखुर्द धरणामुळे भंडारा आणि पवनी तालुक्यातील ३४ गावे पुर्णत: बाधित क्षेत्रात आली. त्यापैकी ३२ गावांचे पुनर्वसन झाले. परंतु भंडारा ...

गोसेखुर्द धरणामुळे भंडारा आणि पवनी तालुक्यातील ३४ गावे पुर्णत: बाधित क्षेत्रात आली. त्यापैकी ३२ गावांचे पुनर्वसन झाले. परंतु भंडारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंडकेपार आणि पिंडकेपार टोली आणि सालेबर्डी खैरी या दोन गावांचे पुनर्वसन मात्र रखडलेले आहे. पिंडकेपार मूळ गावातील नागरिकांना बेला येथे पट्टे देण्यात आले. परंतु पिंडकेपार टोलीचा तर प्रश्न अद्यापही कायम आहे. २००४ च्या सुधारित सर्वेनुसार पिंडकेपार टोली येथील ७४ घरांचा निवाडा ५ डिसेंबर २०१२ रोजी पारित झाला होता. ७४ घरांचा सुधारित संयुक्त मोजणी अहवालासह पिंडकेपार टोली येथील ७४ खातेदारांचे मंजूर यादीत क्षेत्रफळामध्ये तफावत आढळून आली. तेव्हापासून हा प्रश्न कायम रेंगाळत आहे. अद्यापही या गावचे पुनर्वसन झाले नाही.

वैनगंगा नदीला १९६२ साली महापूर आला होता. त्यामुळे मूळ पिंडकेपार गावातील नदीतिरावरील कुटुंबांना टोलीवर स्थालांतरीत करण्यात आले. तेव्हा ५४ पट्टे भेटले होते. आता तेथे १०५ कुटूंब झाले आहेत. तर ७४ घरांचे पुनर्वसन मंजूर झाले आहेत. बेला येथील राष्ट्रीय महामार्गावर टोलीतील नागरिकांना जागा दिली जाणार असे सांगण्यात आले. परंतु अद्यापही सर्वच्या सर्व कुटूंब पिंडकेपार टोलीतच राहतात.

गावालगत असलेली ही टोली म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय पशुपालन आणि शेती आहे. दरवर्षी वैनगंगेला पूर आला की गावाला वेढा पडतो. परंतु टोली थोडी उंचावर असल्याने गावाला जेवढा पुराचा फटका बसतो तेवढा टोलीला बसत नाही. मात्र गोसेखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रात गाव येत असल्याने आज ना उद्या या धरणाचे पाणी वाढविले जाईल आणि संपूर्ण गाव पाण्याखाली येईल. त्यामुळे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

घर पडले तरी बांधता येत नाही

पिंडकेपार टोली गावाचे पुनर्वसन घोषित झाल्याने येथे कोणत्याही नागरी सुविधा नाहीत. घरकुल योजनेचा कुणाला लाभही मिळत नाही. घर पडले तरी बांधता येत नाही असे पिंडकेपार टोली येथील बेबी माकडे सांगत होत्या. शासनाने आमच्या मजुरीची व्यवस्था करावी. गेल्या वर्षी पावसाळ्यात घर पडले. परंतु आता घर बांधायला पैसेही नाहीत असे त्या म्हणाल्या.

अधिकारी केवळ टोलवाटोलवी करतात

पिंडकेपार टोलीचा रहिवासी राकेश तांबुलकर हा खासगी नोकरी करतो. गावाचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे अशी त्याचीच नाही तर संपूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे. परंतु अधिकारी आज होईल, उद्या होईल असे फिरवित आहे. आता कुणाकडे जावे असा प्रश्न आहे. पावसाळा आला की मनात कायम भीती असते असे राकेश सांगत होता.