शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

आडवाटेने येणार काय भंडाऱ्यात कोरोना ...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 14:16 IST

परजिल्ह्यात येण्यावर प्रतिबंध असताना आडमार्गाने अनेकांची पाऊले भंडारा जिल्ह्यात शिरकाव करीत आहेत. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उफाळत असलेला कोरोना विषाणू भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणार तर नाही ना, ही भीती नागरिक व्यक्त करीत आहेत .

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीती , व्यापारी व अन्य लोकांची वर्दळ थांबविण्याची मागणी

राजू बांतेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: परजिल्ह्यात येण्यावर प्रतिबंध असताना आडमार्गाने अनेकांची पाऊले भंडारा जिल्ह्यात शिरकाव करीत आहेत. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उफाळत असलेला कोरोना विषाणू भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणार तर नाही ना, ही भीती नागरिक व्यक्त करीत आहेत .कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. जमावबंदी, टाळेबंदीने सगळे घरीच थांबले आहेत. काही  व्यवसाय जागीच अडकले आहेत. पण,  लोक लॉकडाऊनला न घाबरता व्यवसायासाठी बाहेर पडत आहेत. एवढ्यावर न थांबता काही व्यापारी चोर वाटेने दुसºया जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. मोहाडी तालुक्यातील सीतेपार झंझाड, पांढराबोडी, काटी, धूसाळा ही गावे नागपूर जिल्ह्याच्या सीमा रेषेवर आहेत.नागपूर जिल्ह्यातील व्यापारी या आडमार्गाच्या गावावरून सहजतेने भंडारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. सध्या लॉकडाऊन आहे. पोलीस विभागाने भंडारा जिल्ह्याच्या मुख्य मार्गाची सीमाबंदी केली आहे. सीमा बंदस्थानी चोवीस तास पोलीस विभाग तैनात आहेत. परजिल्ह्यातील लोक दुसºया जिल्ह्यात जावू नयेत यासाठी  नागपूरचा राज्यमार्ग, खात-रामटेक  रोड, शहापूर मार्ग, कांद्री-रामटेक मार्ग, मध्यप्रदेश मार्ग आदी  भंडारा जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.नागपूर जिल्ह्यातील लोकांना वायगाव, मुरमाडी मार्गाने भंडाºयाच्या सीमेत येता येते. तसेच पांढराबोडी, काटी वरून धानोली, वाकेश्वर  मार्ग, धूसाळावरून धानोली, कोदामेडी या आड मार्गानेही  नागपूर व  कामठी येतील बरीच मंडळी भंडारा जिल्ह्यात पाय ठेवत आहेत. पश्चिमेकडील ही गावे नागपूर जिल्ह्याच्या अगदी टोकावर आहेत. त्यामुळे मौदा,  कामठी, नागपूर येथील गाय, म्हशी, शेळ्या घेणारे व्यापारी भंडारा जिल्ह्यात दररोज प्रवेश करीत आहेत.नागपूरच्या उपराजधानीत आतापर्यंत ५६ कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झाली आहे. अनेक संशयीत रुग्ण आढळून आली आहेत. त्यामुळे उपराजधानी कोरोनामुळे अधिक धोकादायक स्थितीत आहे. अशा वेळी नागपूर जिल्ह्यातील लोक भंडारा जिल्ह्यात येत असल्याने पांढराबोडी, धूसाळा, काटी, सीतेपार, हरदोली आदी परिसरातील  गावातील लोकांमध्ये कोरोना या आडमार्गाने येणार तर नाही ना, ही भीती सतावत आहे.आता तर ग्रामस्थानी असे आड मार्ग अडविण्यास पुढाकार घेतला आहे. हत्तीडोई येथील ग्रामस्थांनी भीतीमुळे नागपूर वरून येणारा रस्ता बंद केला आहे. हत्तीडोई याही मार्गाने लोक भंडारा जिल्ह्यात शिरत आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोनाचे एकही रुग्ण नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.प्रशासन झाले सतर्कहरदोली येथील सरपंच सदाशिव ढेंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट  संवाद साधला. या गंभीर विषयाची माहिती दिली. दोन दिवसात असे आड मार्ग बंद केले जातील, असे आश्वस्त जिल्हाधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस