शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

आडवाटेने येणार काय भंडाऱ्यात कोरोना ...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 14:16 IST

परजिल्ह्यात येण्यावर प्रतिबंध असताना आडमार्गाने अनेकांची पाऊले भंडारा जिल्ह्यात शिरकाव करीत आहेत. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उफाळत असलेला कोरोना विषाणू भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणार तर नाही ना, ही भीती नागरिक व्यक्त करीत आहेत .

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीती , व्यापारी व अन्य लोकांची वर्दळ थांबविण्याची मागणी

राजू बांतेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: परजिल्ह्यात येण्यावर प्रतिबंध असताना आडमार्गाने अनेकांची पाऊले भंडारा जिल्ह्यात शिरकाव करीत आहेत. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उफाळत असलेला कोरोना विषाणू भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणार तर नाही ना, ही भीती नागरिक व्यक्त करीत आहेत .कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. जमावबंदी, टाळेबंदीने सगळे घरीच थांबले आहेत. काही  व्यवसाय जागीच अडकले आहेत. पण,  लोक लॉकडाऊनला न घाबरता व्यवसायासाठी बाहेर पडत आहेत. एवढ्यावर न थांबता काही व्यापारी चोर वाटेने दुसºया जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. मोहाडी तालुक्यातील सीतेपार झंझाड, पांढराबोडी, काटी, धूसाळा ही गावे नागपूर जिल्ह्याच्या सीमा रेषेवर आहेत.नागपूर जिल्ह्यातील व्यापारी या आडमार्गाच्या गावावरून सहजतेने भंडारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. सध्या लॉकडाऊन आहे. पोलीस विभागाने भंडारा जिल्ह्याच्या मुख्य मार्गाची सीमाबंदी केली आहे. सीमा बंदस्थानी चोवीस तास पोलीस विभाग तैनात आहेत. परजिल्ह्यातील लोक दुसºया जिल्ह्यात जावू नयेत यासाठी  नागपूरचा राज्यमार्ग, खात-रामटेक  रोड, शहापूर मार्ग, कांद्री-रामटेक मार्ग, मध्यप्रदेश मार्ग आदी  भंडारा जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.नागपूर जिल्ह्यातील लोकांना वायगाव, मुरमाडी मार्गाने भंडाºयाच्या सीमेत येता येते. तसेच पांढराबोडी, काटी वरून धानोली, वाकेश्वर  मार्ग, धूसाळावरून धानोली, कोदामेडी या आड मार्गानेही  नागपूर व  कामठी येतील बरीच मंडळी भंडारा जिल्ह्यात पाय ठेवत आहेत. पश्चिमेकडील ही गावे नागपूर जिल्ह्याच्या अगदी टोकावर आहेत. त्यामुळे मौदा,  कामठी, नागपूर येथील गाय, म्हशी, शेळ्या घेणारे व्यापारी भंडारा जिल्ह्यात दररोज प्रवेश करीत आहेत.नागपूरच्या उपराजधानीत आतापर्यंत ५६ कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झाली आहे. अनेक संशयीत रुग्ण आढळून आली आहेत. त्यामुळे उपराजधानी कोरोनामुळे अधिक धोकादायक स्थितीत आहे. अशा वेळी नागपूर जिल्ह्यातील लोक भंडारा जिल्ह्यात येत असल्याने पांढराबोडी, धूसाळा, काटी, सीतेपार, हरदोली आदी परिसरातील  गावातील लोकांमध्ये कोरोना या आडमार्गाने येणार तर नाही ना, ही भीती सतावत आहे.आता तर ग्रामस्थानी असे आड मार्ग अडविण्यास पुढाकार घेतला आहे. हत्तीडोई येथील ग्रामस्थांनी भीतीमुळे नागपूर वरून येणारा रस्ता बंद केला आहे. हत्तीडोई याही मार्गाने लोक भंडारा जिल्ह्यात शिरत आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोनाचे एकही रुग्ण नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.प्रशासन झाले सतर्कहरदोली येथील सरपंच सदाशिव ढेंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट  संवाद साधला. या गंभीर विषयाची माहिती दिली. दोन दिवसात असे आड मार्ग बंद केले जातील, असे आश्वस्त जिल्हाधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस