शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

वन्यजीवांची पाण्यासाठी गावांकडे आगेकुच; जंगलातील जलस्त्रोत आटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:18 IST

वनविभागाची उदासीनता : पाणवठ्यांसाठी वनविभागासह जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून तातडीने उपाय योजना करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : उन्हाळा सुरू होताच तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. त्याचा मोठा फटका जंगलातील वन्यप्राण्यांना बसत आहे. लाखनी वनपरीक्षेत्रांतर्गत लाखनी, जांभळी व उमरझरी या तीन सहवनक्षेत्रांचा समावेश असून, या भागातील जंगलात नैसर्गिक जलस्रोत वगळता मोठ्या प्रमाणावर कृत्रिम पाणवठे उपलब्ध नाहीत. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत आहेत.

वन्यप्राण्यांसाठी जंगलातील नदी, नाले, तळे आणि नैसर्गिक जलस्रोत उन्हाळ्यात कोरडे पडू लागतात. त्यामुळे या भागातील वाघ, बिबटे, हरणे, ससे, लांडगे, कोल्हे तसेच विविध प्रकारचे पशु-पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहेत. वन विभागाच्या वतीने काही ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले असले तरी ते दुरवस्थेत असल्याने पाणी गळती होत आहे, परिणामी पाणवठे निष्क्रिय ठरत आहेत. वन्यप्राण्यांचे जंगलामध्ये नैसर्गिक अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी योग्य पाणीपुरवठा होणे अत्यावश्यक आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करावे.

वनविभागाकडे मागण्यानादुरुस्त पाणवठ्यांची त्वरित दुरुस्ती करावी. नवीन पाणवठे उभारून वन्यप्राण्यांना पुरेसा जलसाठा उपलब्ध करून द्यावा. वॉटर टँकरद्वारे उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा करावा. वन्यप्राण्यांना पाणी सहज उपलब्ध होईल, अशा ठिकाणी अधिक पाणवठे निर्माण करावेत. महामार्ग ओलांडणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात.

नादुरुस्त पाणवठ्यांमुळे समस्या गंभीरवन्यप्राण्यांसाठी वनविभागाने काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे निर्माण केले असले, तरी त्यांच्या योग्य देखभालीअभावी हे पाणवठे निकामी होत चालले आहेत. पाण्याची गळती, साफसफाईचा अभाव आणि जलपुरवठ्याचे अपयश यामुळे अनेक पाणवठे कोरडे पडले आहेत. परिणामी, वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे वळत आहेत.

लाखनी व जांभळी सहवन क्षेत्रातील वन्यप्राणी पाण्यासाठी महामार्ग ओलांडताना अनेकदा अपघातग्रस्त होतात. उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र बनते, पाण्याच्या शोधातील प्राण्यांना रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत जीव गमवावा लागतो. 

टॅग्स :bhandara-acभंडारा