शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांची पाण्यासाठी गावांकडे आगेकुच; जंगलातील जलस्त्रोत आटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:18 IST

वनविभागाची उदासीनता : पाणवठ्यांसाठी वनविभागासह जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून तातडीने उपाय योजना करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : उन्हाळा सुरू होताच तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. त्याचा मोठा फटका जंगलातील वन्यप्राण्यांना बसत आहे. लाखनी वनपरीक्षेत्रांतर्गत लाखनी, जांभळी व उमरझरी या तीन सहवनक्षेत्रांचा समावेश असून, या भागातील जंगलात नैसर्गिक जलस्रोत वगळता मोठ्या प्रमाणावर कृत्रिम पाणवठे उपलब्ध नाहीत. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत आहेत.

वन्यप्राण्यांसाठी जंगलातील नदी, नाले, तळे आणि नैसर्गिक जलस्रोत उन्हाळ्यात कोरडे पडू लागतात. त्यामुळे या भागातील वाघ, बिबटे, हरणे, ससे, लांडगे, कोल्हे तसेच विविध प्रकारचे पशु-पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहेत. वन विभागाच्या वतीने काही ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले असले तरी ते दुरवस्थेत असल्याने पाणी गळती होत आहे, परिणामी पाणवठे निष्क्रिय ठरत आहेत. वन्यप्राण्यांचे जंगलामध्ये नैसर्गिक अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी योग्य पाणीपुरवठा होणे अत्यावश्यक आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करावे.

वनविभागाकडे मागण्यानादुरुस्त पाणवठ्यांची त्वरित दुरुस्ती करावी. नवीन पाणवठे उभारून वन्यप्राण्यांना पुरेसा जलसाठा उपलब्ध करून द्यावा. वॉटर टँकरद्वारे उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा करावा. वन्यप्राण्यांना पाणी सहज उपलब्ध होईल, अशा ठिकाणी अधिक पाणवठे निर्माण करावेत. महामार्ग ओलांडणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात.

नादुरुस्त पाणवठ्यांमुळे समस्या गंभीरवन्यप्राण्यांसाठी वनविभागाने काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे निर्माण केले असले, तरी त्यांच्या योग्य देखभालीअभावी हे पाणवठे निकामी होत चालले आहेत. पाण्याची गळती, साफसफाईचा अभाव आणि जलपुरवठ्याचे अपयश यामुळे अनेक पाणवठे कोरडे पडले आहेत. परिणामी, वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे वळत आहेत.

लाखनी व जांभळी सहवन क्षेत्रातील वन्यप्राणी पाण्यासाठी महामार्ग ओलांडताना अनेकदा अपघातग्रस्त होतात. उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र बनते, पाण्याच्या शोधातील प्राण्यांना रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत जीव गमवावा लागतो. 

टॅग्स :bhandara-acभंडारा