शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी बचावासाठी योजना ढीगभर, प्रत्यक्ष अंमलबजावणी बोटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST

तुमसर: जंगलाशेजारी शेतशिवारात विहिरींना कठडे बांधण्यासाठी वन विभागाची श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेसह केंद्र शासनाच्या ढीगभर योजना अस्तित्त्वात आहेत. ...

तुमसर: जंगलाशेजारी शेतशिवारात विहिरींना कठडे बांधण्यासाठी वन विभागाची श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेसह केंद्र शासनाच्या ढीगभर योजना अस्तित्त्वात आहेत. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने जंगलातील बिबट्या, वाघ व इतर वन्य प्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडत आहेत.एका आठवड्यापूर्वी भंडारा जिल्ह्यात अशी घटना घडली. यावर मात करण्याकरिता तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन विभागाने वन्यप्राणी बचावासाठी यापूर्वीच पुढाकार घेतला असून, या वन परिक्षेत्रात वन्यप्राणी मृत्युमुखी पडले नाहीत.

गत आठवड्यात भंडारा जिल्ह्यात वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू पाण्याच्या टाक्यात पडून झाला होता. त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आल्याची चर्चा संपूर्ण राज्यात चर्चेला आली. सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी जंगलातील व जंगलांलगतच्या शेतातील विहिरींची माहिती प्रत्येक वन परिक्षेत्रातून पाठविण्याचे निर्देश वन विभागाने दिले होते. सदर विहिरींना कठडे बांधण्याची कामे तत्काळ करावी व तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश वन विभागाने केले होते. यानंतरही जंगलव्याप्त परिसरात विहिरीत पडून वन्यप्राणी मृत्यूमुखी पडत आहेत. या घटनांमुळे वन विभागाचे दुर्लक्ष येथे दिसत आहे. अद्यापपर्यंत वन विभागाने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही, असे दिसून येते. वन विभागाने संबंधित वन परिक्षेत्राला आदेश दिल्यानंतरही दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यात वन्य प्राणी जंगलात पाण्यासाठी वणवण भटकतात. रानटी कुत्रे पाठलाग करताना अनेक तृणभक्षी प्राण्यांचा जीव गेला आहे. वाघ, बिबट्यासह अन्य प्राण्यांचा सातत्याने कठडाविना विहिरीत पडून मृत्यू होत आहे.

बॉक्स

नाकाडोंगरी वन परिक्षेत्र चर्चेत

राज्याच्या शेवटच्या टोकावर तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी जंगल शिवारातील विहिरींना कठडे बांधण्याचा नवीन पायंडा घातला. सदर जंगल घनदाट व राखीव आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. केंद्र शासनाची योजना व शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत केवळ दहा लाख रुपयात वन परिक्षेत्रातील ३९ विहिरींवर आतापर्यंत कठडे उभारले आहेत. यामुळे या वन परिक्षेत्रात वन्यप्राणी विहिरीत पडण्याचे प्रमाण शून्य आहे. हा पॅटर्न संपूर्ण राज्यात लावल्यास वन्य प्राण्यांचा जीव वाचविण्यास मोठी मदत होईल.

कोट

केंद्र पुरस्कृत योजना व शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत नाकाडोंगरी वन परिक्षेत्रात जंगलात लागून असणाऱ्या शेतातील विहिरी व जिथे अशा घटना होण्याची शक्यता आहे त्या गावातील विहिरींची निवड केली. या विहिरींवर शेतकऱ्यांना कठडे बांधून घेण्याकरिता अर्ज करण्यास सांगण्यात आले. सन २०१९ - २० या काळात विहिरीवर कठडे बांधून झाले. त्यानंतर नाका डोंगरी वन परिक्षेत्रात वन्यप्राणी विहिरीत पडण्याची एकही घटना घडली नाही.

नितेश धनविजय

वन परिक्षेत्र अधिकारी, नाका डोंगरी.