शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

वन्यप्राण्यांनी केले ऊस पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: February 18, 2015 00:23 IST

चिखला शेत शिवारात जंगलाशेजारील शेतात वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे ऊस शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. ऊस पिकांच्या नासधुसीमुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणी करावी लागत आहे.

तुमसर : चिखला शेत शिवारात जंगलाशेजारील शेतात वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे ऊस शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. ऊस पिकांच्या नासधुसीमुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणी करावी लागत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी वनविभागाला तक्रार केल्यावरही एका महिन्यानंतरही पंचनामा केला नाही. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याची बतावणी विभाग करीत आहे.चिखला येथील शेतकरी दशरथ अनंतराम गेडाम व नत्थू केवल बोरकर यांनी अनुक्रमे दीड व दोन एकर शेतात ऊस लागवड केली आहे. एक महिन्यापूर्वी वन्यप्राण्यांनी संपूर्ण ऊस पीक उध्वस्त केले. याची रितसर तक्रार नाकाडोंगरी वनविभागाला करण्यात आली. ऊस भूईसपाट झाल्याने संबंधित शेतकऱ्यांनी ऊस तोडणी केली. एक महिन्यापासून पंचनामा करण्याकरिता वनविभागाचे कर्मचारी आले नाही. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर येथे आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. सातपुडा पर्वतरांगा असलेल्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात चिखला हे गाव येते. जंगलात पानवठे नाहीत. त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे येतात.कर्तव्यात कसूर व दप्तरदिरंगाई येथे केली जाते असा आरोप चिखल्याचे उपसरपंच दिलीप सोनवाने यांनी केला आहे. येत्या दोन दिवसात कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा सोनवाने यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)