शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जंगली हत्तींचा कळप जिल्ह्याबाहेर; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2022 17:01 IST

१३ दिवस धुमाकूळ घालून गडचिरोली जिल्ह्यात

भंडारा : जंगली हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात १३ दिवस धुमाकूळ घालत शुक्रवारी पहाटे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला. हत्ती जिल्ह्याबाहेर गेल्याने वनविभागासह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. या हत्तींनी साकोली, लाखनी, लाखांदूर या तीन तालुक्यांत धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.

साकोली तालुक्यात २७ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातून २३ हत्तींचा कळप दाखल झाला होता. सानगडी परिसरात या हत्तींनी धुमाकूळ घातला. झाडगाव, केसलवाडा, सिरेगाव येथे शेतकऱ्यांचे नुकसान केले. २९ नोव्हेंबर रोजी हत्तींच्या कळपाने लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही जंगलात प्रवेश केला. रेंगेपार कोहळी या परिसरात चांगलाच उच्छाद मांडला. शेतकऱ्यांचे धानाचे पुंजने उद्ध्वस्त करून मातोश्री गोशाळेची तोडफोड केली. चिचटोला येथे उसाचे नुकसान केले. दिवसभर विश्रांती आणि रात्री धुमाकूळ असा या हत्तींचा दिनक्रम होता. ३ डिसेंबर रोजी देवरी गोंदी परिसरात या हत्तींनी धुमाकूळ घातला. शिवनी, मोगरा, झरप, गडपेंढरी, गिरोला, मुरमाडी तुपकर या परिसरातही हत्तींनी मोठे नुकसान केले.

७ डिसेंबर रोजी हत्तींचा कळप लाखांदूर तालुक्यात शिरला. दिघोरीमोठी परिसरात मालदा परिसरात मोठे नुकसान केले. त्यानंतर दहेगाव माईन्स गावात रात्रीच्या वेळी शिरलेल्या हत्तींच्या कळपाने तीन घरे जमीनदोस्त केली. दहेगाव येथून सोनी इंदोरा मार्गे हत्तींचा कळप शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. हत्तींचा कळप जिल्ह्याबाहेर गेल्याने वनविभागासह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वनविभागाचा हत्तींवर अहोरात्र होता वाॅच

भंडारा जिल्ह्यात हत्तींचा कळप दाखल झाल्यापासून वनविभाग त्यांच्यावर नजर ठेवून होता. हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाही याची दक्षता घेतली जात होती. उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे यांच्यासह तब्बल ६० कर्मचाऱ्यांचे पथक हत्तींच्या मागावर होते. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे पथक लक्ष ठेवून होते. हत्ती नियंत्रणासाठी पश्चिम बंगालच्या सेज संस्थेची मदतही घेतली जात होती.

धान पुंजन्यांचे झाले नुकसान

हत्तींच्या कळपाने शेतशिवारात मोठा धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पुंजने उधळून लावले होते. यासोबतच रेंगेपार कोहळी येथे गोशाळेचे नुकसान केले तर दहेगाव येथे तीन घरे उद्ध्वस्त केली. वनविभागाच्या वतीने सर्व नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, नियमानुसार सर्वांना मदत दिली जाणार आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवbhandara-acभंडाराforest departmentवनविभाग