शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अखेर जंगली हत्तींचा कळप जिल्ह्याबाहेर; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2022 17:01 IST

१३ दिवस धुमाकूळ घालून गडचिरोली जिल्ह्यात

भंडारा : जंगली हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात १३ दिवस धुमाकूळ घालत शुक्रवारी पहाटे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला. हत्ती जिल्ह्याबाहेर गेल्याने वनविभागासह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. या हत्तींनी साकोली, लाखनी, लाखांदूर या तीन तालुक्यांत धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.

साकोली तालुक्यात २७ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातून २३ हत्तींचा कळप दाखल झाला होता. सानगडी परिसरात या हत्तींनी धुमाकूळ घातला. झाडगाव, केसलवाडा, सिरेगाव येथे शेतकऱ्यांचे नुकसान केले. २९ नोव्हेंबर रोजी हत्तींच्या कळपाने लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही जंगलात प्रवेश केला. रेंगेपार कोहळी या परिसरात चांगलाच उच्छाद मांडला. शेतकऱ्यांचे धानाचे पुंजने उद्ध्वस्त करून मातोश्री गोशाळेची तोडफोड केली. चिचटोला येथे उसाचे नुकसान केले. दिवसभर विश्रांती आणि रात्री धुमाकूळ असा या हत्तींचा दिनक्रम होता. ३ डिसेंबर रोजी देवरी गोंदी परिसरात या हत्तींनी धुमाकूळ घातला. शिवनी, मोगरा, झरप, गडपेंढरी, गिरोला, मुरमाडी तुपकर या परिसरातही हत्तींनी मोठे नुकसान केले.

७ डिसेंबर रोजी हत्तींचा कळप लाखांदूर तालुक्यात शिरला. दिघोरीमोठी परिसरात मालदा परिसरात मोठे नुकसान केले. त्यानंतर दहेगाव माईन्स गावात रात्रीच्या वेळी शिरलेल्या हत्तींच्या कळपाने तीन घरे जमीनदोस्त केली. दहेगाव येथून सोनी इंदोरा मार्गे हत्तींचा कळप शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. हत्तींचा कळप जिल्ह्याबाहेर गेल्याने वनविभागासह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वनविभागाचा हत्तींवर अहोरात्र होता वाॅच

भंडारा जिल्ह्यात हत्तींचा कळप दाखल झाल्यापासून वनविभाग त्यांच्यावर नजर ठेवून होता. हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाही याची दक्षता घेतली जात होती. उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे यांच्यासह तब्बल ६० कर्मचाऱ्यांचे पथक हत्तींच्या मागावर होते. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे पथक लक्ष ठेवून होते. हत्ती नियंत्रणासाठी पश्चिम बंगालच्या सेज संस्थेची मदतही घेतली जात होती.

धान पुंजन्यांचे झाले नुकसान

हत्तींच्या कळपाने शेतशिवारात मोठा धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पुंजने उधळून लावले होते. यासोबतच रेंगेपार कोहळी येथे गोशाळेचे नुकसान केले तर दहेगाव येथे तीन घरे उद्ध्वस्त केली. वनविभागाच्या वतीने सर्व नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, नियमानुसार सर्वांना मदत दिली जाणार आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवbhandara-acभंडाराforest departmentवनविभाग