शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जंगली हत्तींचा कळप जिल्ह्याबाहेर; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2022 17:01 IST

१३ दिवस धुमाकूळ घालून गडचिरोली जिल्ह्यात

भंडारा : जंगली हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात १३ दिवस धुमाकूळ घालत शुक्रवारी पहाटे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला. हत्ती जिल्ह्याबाहेर गेल्याने वनविभागासह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. या हत्तींनी साकोली, लाखनी, लाखांदूर या तीन तालुक्यांत धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.

साकोली तालुक्यात २७ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातून २३ हत्तींचा कळप दाखल झाला होता. सानगडी परिसरात या हत्तींनी धुमाकूळ घातला. झाडगाव, केसलवाडा, सिरेगाव येथे शेतकऱ्यांचे नुकसान केले. २९ नोव्हेंबर रोजी हत्तींच्या कळपाने लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही जंगलात प्रवेश केला. रेंगेपार कोहळी या परिसरात चांगलाच उच्छाद मांडला. शेतकऱ्यांचे धानाचे पुंजने उद्ध्वस्त करून मातोश्री गोशाळेची तोडफोड केली. चिचटोला येथे उसाचे नुकसान केले. दिवसभर विश्रांती आणि रात्री धुमाकूळ असा या हत्तींचा दिनक्रम होता. ३ डिसेंबर रोजी देवरी गोंदी परिसरात या हत्तींनी धुमाकूळ घातला. शिवनी, मोगरा, झरप, गडपेंढरी, गिरोला, मुरमाडी तुपकर या परिसरातही हत्तींनी मोठे नुकसान केले.

७ डिसेंबर रोजी हत्तींचा कळप लाखांदूर तालुक्यात शिरला. दिघोरीमोठी परिसरात मालदा परिसरात मोठे नुकसान केले. त्यानंतर दहेगाव माईन्स गावात रात्रीच्या वेळी शिरलेल्या हत्तींच्या कळपाने तीन घरे जमीनदोस्त केली. दहेगाव येथून सोनी इंदोरा मार्गे हत्तींचा कळप शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. हत्तींचा कळप जिल्ह्याबाहेर गेल्याने वनविभागासह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वनविभागाचा हत्तींवर अहोरात्र होता वाॅच

भंडारा जिल्ह्यात हत्तींचा कळप दाखल झाल्यापासून वनविभाग त्यांच्यावर नजर ठेवून होता. हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाही याची दक्षता घेतली जात होती. उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे यांच्यासह तब्बल ६० कर्मचाऱ्यांचे पथक हत्तींच्या मागावर होते. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे पथक लक्ष ठेवून होते. हत्ती नियंत्रणासाठी पश्चिम बंगालच्या सेज संस्थेची मदतही घेतली जात होती.

धान पुंजन्यांचे झाले नुकसान

हत्तींच्या कळपाने शेतशिवारात मोठा धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पुंजने उधळून लावले होते. यासोबतच रेंगेपार कोहळी येथे गोशाळेचे नुकसान केले तर दहेगाव येथे तीन घरे उद्ध्वस्त केली. वनविभागाच्या वतीने सर्व नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, नियमानुसार सर्वांना मदत दिली जाणार आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवbhandara-acभंडाराforest departmentवनविभाग