शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाळा ते पालांदुर रस्त्याचे रुंदीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:29 IST

भंडारा : जेवणाळा ते पालांदूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम रखडले असून, या रस्त्याचे काम सुरू ...

भंडारा : जेवणाळा ते पालांदूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम रखडले असून, या रस्त्याचे काम सुरू करण्याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी व वाहनचालकांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून, याविरोधात तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा भीम शक्ती संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

लाखनी तालुक्यातील पालांदूर हे सर्वात मोठे गाव असून, येथे शाळा, महाविद्यालय, विविध बँका, पोलीस स्थानक, रुग्णालय व बाजारपेठ असून, परिसरातील नागरिकांना दररोज विविध कामानिमित्त पालांदूर येथे यावे लागते. तसेच मानेगाव ते पालांदूर या मार्गावरून लाखांदूर, अड्याल, पवनी, गडचिरोली, चंद्रपूरकडे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू आहे तसेच पादचारी, सायकलस्वार, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना सतत प्रवास करावा लागतो, एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात विद्यार्जन करण्यासाठी जावे लागते, नागरिकांना बँकेच्या कामानिमित्त ये-जा करावी लागते तसेच रुग्णांना औषधोपचारांसाठी पालांदूर येथील रुग्णालयात जावे लागते. आठवडा बाजाराच्या निमित्ताने या मार्गावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे मानेगाव ते पालांदूर या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले असून, मानेगाव ते गुरढाया गावापर्यंत रुंदीकरण व डांबरीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक जेवणाला ते पालांदूरपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण काम रखडले असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना कमालीचा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

जेवणाला ते पालांदूर रस्त्याचे काम सुरू न करण्याचे कारण काय? या रस्त्याचे काम ज्या एजन्सीला देण्यात आले त्यांनी काम सुरू करण्यास अतिविलंब करण्याचे कारण काय? या रस्त्याचे काम सुरू करणार किंवा कसे, याला जबाबदार कोण, आदी प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून, भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण काम तत्काळ सुरू करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमने, कोमल कांबळे, जयपाल रामटेके, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहिवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, उमाकांत काणेकर, अविनाश खोब्रागडे, यशवंत घरडे, जितेंद्र खोब्रागडे, सुरेश गेडाम, नितीश काणेकर, निकाराम शेंडे, सुभाष शेंडे, अविनाश बोरकर, शांताराम खोब्रागडे यांनी केली आहे.