शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या प्रवासाला कुणाचे अभय?

By admin | Updated: June 16, 2015 00:41 IST

काळीपिवळी ट्रॅक्स, खासगी बस, अँटो आदीसह विविध खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रवासी क्षमता ठरवून देण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षवाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासीलाखनी : काळीपिवळी ट्रॅक्स, खासगी बस, अँटो आदीसह विविध खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रवासी क्षमता ठरवून देण्यात आली आहे. मात्र तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, अड्याळ व पवनी या भागासह संपूर्ण जिल्ह्यात अनधिकृत व इतर खासगी वाहनांमध्ये क्षमतेपक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र या जीवघेण्या प्रवासाकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विनापरवाना तसेच कागदपत्र नसलेल्या दुचाकीधारकांवर कारवाई होत आहे. मात्र चारचाकी वाहनधारकांना अभय मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी, साकोली, गोंदिया व तिरोडा अशी सहा आगार आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व अंतर बघता या दोन्ही आगारात बसगाड्यांची कमतरता आहे. याशिवाय पुरेशा चालक-वाहकाअभावी आगाराच्यावतीने अनेकदा दुर्गम भागातील बसफेऱ्या बंद केल्या जातात. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला उधाण आले आहे. जुन्या भंगार झालेल्या टॅक्सीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी कोंबून खुलेआम वाहतूक केली जात आहे. आजपर्यंत अशा वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक अपघात घडले असून कित्येक जणांना जीव गमवावा लागला आहे. मात्र जुन्या काळीपिवळी टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशी नकार देत नाहीत. धकाधकीच्या आधुनिक काळात कमी वेळेत अधिक कामे उरकून घेण्याच्या लगबगीत अनेक नागरिक जीवघेणा प्रवास करतात. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.(तालुका प्रतिनिधी)हा तर जीवघेणा प्रवास !जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात होणाऱ्या प्रवासी वाहतुकीत प्रत्येक वाहनात प्रवासी लटकलेले दिसून येतात. येथे गाडी भरण्याचे पॉइंट आहेत व यावर माणसांची नेमणूक केलेली असते. वाहन भरल्यानंतर त्याला प्रत्येकी वाहनाचे पैस ठरले असतात. वाहन प्रवाशी भरताना प्रवाशांचा जीवाची पर्वा न करता वाहन भरले जाते. भंडारा येथून पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी, तुमसर, मोहाडी, अड्याळ, जवाहरनगर या प्रमुख गावांसह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक चालते. यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहने जाताना आढळून येतात. या वाहनांच्या दारांना लॉक नाही. सिटांच्या जागेवर लाकडी बेंच बसविले आहेत. अनेक प्रवासी वाहनाबाहेर लटकलेले दिसतात.