शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

पांढऱ्या लोंबीने उन्हाळी धानाचे उत्पन्न घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

लाखनी तालुक्यात सुमारे १९८२ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आलेली आहे. यात पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे ९८१ हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीखाली आलेली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षाला उन्हाळी धानाचे क्षेत्रफळ थोडे वाढलेले आहे. खरीपात वरूण राजाने प्रसन्नता दाखवित नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली होती. त्यामुळे भूजल साठ्यात एक ते दीड मीटरने वाढ झालेली जाणवली.

ठळक मुद्देलाखनी तालुका: चारदा फवारणी करूनही नियंत्रण नाही, खरिपाच्या खरेदीने गोडाऊन फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान कापणीला सुरुवात होत आहे. दरवर्षीच्या उन्हाळी धानाचा स्थिती पाहता यावर्षी पांढºया लोंबीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने धानाचे उत्पन्न अर्ध्यावर येण्याची शक्यता वाढली आहे.लाखनी तालुक्यात सुमारे १९८२ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आलेली आहे. यात पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे ९८१ हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीखाली आलेली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षाला उन्हाळी धानाचे क्षेत्रफळ थोडे वाढलेले आहे. खरीपात वरूण राजाने प्रसन्नता दाखवित नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली होती. त्यामुळे भूजल साठ्यात एक ते दीड मीटरने वाढ झालेली जाणवली. याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी उन्हाळी धानात व भाजीपाला क्षेत्रात लागवड वाढवली आहे. १५ एप्रिलपर्यत वरुण राजाने अवकाळीच्या रूपाने हजेरी लावल्याने उन्हाळी धानाला पाणीटंचाई जाणवली नाही. भूजल जरी त्रासदायक ठरला नसला तरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण नियमित असल्याने खोडकिडीचा, पर्णकोष करपाचा त्रास अधिक झाल्याने आता निसव्यावरील पांढºया लोंबीचे प्रमाण सर्वाधिक जाणवत असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. सुरुवातीपासून रोग व किडीचा अभ्यास घेत कृषी विभाग व भात पैदाकार यांच्या सल्ल्यानुसार शेतकºयांनी अनेकदा फवारणी करण्यात आली. मात्र नियमित, अवकाळी व ढगाळ वातावरण असल्याने रोग व कीडीला पोषक वातावरण तयार झाल्याने पांढºया लोंबीचे प्रमाणात वाढ झाल्याचे अभ्यासकांकडून वर्तविण्यात आले आहे.शेतकºयांनी नियमित बांधानात उतरून कीडीचा व रोगाचा अभ्यास ठेवावा. वेळेत रोगाचे व किडीचे निदान झाल्यास त्यावर फवारणी निश्चितपणे केल्यास होणारे नुकसान टाळता येते. एका एकराला १८० ते २०० लीटर द्रावण फवारणी अत्यावश्यक आहे. बरेच शेतकरी अपेक्षित असलेला द्रावण फवारणी करीत नसल्याने किडीचा प्रादूर्भाव वाढत जावून पिकाचे नुकसान होते.कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारसीनुसार फवारणी करणे अत्यावश्यक आहे.-गणपती पांडेगावकर,मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.

टॅग्स :agricultureशेती