शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या लोंबीने उन्हाळी धानाचे उत्पन्न घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

लाखनी तालुक्यात सुमारे १९८२ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आलेली आहे. यात पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे ९८१ हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीखाली आलेली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षाला उन्हाळी धानाचे क्षेत्रफळ थोडे वाढलेले आहे. खरीपात वरूण राजाने प्रसन्नता दाखवित नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली होती. त्यामुळे भूजल साठ्यात एक ते दीड मीटरने वाढ झालेली जाणवली.

ठळक मुद्देलाखनी तालुका: चारदा फवारणी करूनही नियंत्रण नाही, खरिपाच्या खरेदीने गोडाऊन फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान कापणीला सुरुवात होत आहे. दरवर्षीच्या उन्हाळी धानाचा स्थिती पाहता यावर्षी पांढºया लोंबीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने धानाचे उत्पन्न अर्ध्यावर येण्याची शक्यता वाढली आहे.लाखनी तालुक्यात सुमारे १९८२ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आलेली आहे. यात पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे ९८१ हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीखाली आलेली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षाला उन्हाळी धानाचे क्षेत्रफळ थोडे वाढलेले आहे. खरीपात वरूण राजाने प्रसन्नता दाखवित नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली होती. त्यामुळे भूजल साठ्यात एक ते दीड मीटरने वाढ झालेली जाणवली. याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी उन्हाळी धानात व भाजीपाला क्षेत्रात लागवड वाढवली आहे. १५ एप्रिलपर्यत वरुण राजाने अवकाळीच्या रूपाने हजेरी लावल्याने उन्हाळी धानाला पाणीटंचाई जाणवली नाही. भूजल जरी त्रासदायक ठरला नसला तरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण नियमित असल्याने खोडकिडीचा, पर्णकोष करपाचा त्रास अधिक झाल्याने आता निसव्यावरील पांढºया लोंबीचे प्रमाण सर्वाधिक जाणवत असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. सुरुवातीपासून रोग व किडीचा अभ्यास घेत कृषी विभाग व भात पैदाकार यांच्या सल्ल्यानुसार शेतकºयांनी अनेकदा फवारणी करण्यात आली. मात्र नियमित, अवकाळी व ढगाळ वातावरण असल्याने रोग व कीडीला पोषक वातावरण तयार झाल्याने पांढºया लोंबीचे प्रमाणात वाढ झाल्याचे अभ्यासकांकडून वर्तविण्यात आले आहे.शेतकºयांनी नियमित बांधानात उतरून कीडीचा व रोगाचा अभ्यास ठेवावा. वेळेत रोगाचे व किडीचे निदान झाल्यास त्यावर फवारणी निश्चितपणे केल्यास होणारे नुकसान टाळता येते. एका एकराला १८० ते २०० लीटर द्रावण फवारणी अत्यावश्यक आहे. बरेच शेतकरी अपेक्षित असलेला द्रावण फवारणी करीत नसल्याने किडीचा प्रादूर्भाव वाढत जावून पिकाचे नुकसान होते.कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारसीनुसार फवारणी करणे अत्यावश्यक आहे.-गणपती पांडेगावकर,मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.

टॅग्स :agricultureशेती