शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

बेराेजगारी, महागाई, युवकांच्या प्रश्नांवर कधी बोलणार? राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 07:06 IST

राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल, साकोलीतील सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारला जोश

लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा: पंतप्रधान देशातील बेराेजगारी, महागाई, शेतकरी युवकांच्या प्रश्नांवर बाेलत नाहीत, त्याऐवजी धर्म, हिंदू-मुस्लीम जातीय तेढ वाढेल असेच बाेलतात, देशात ओबीसींची संख्या माेठी आहे, मात्र त्यांची भागीदारी कुठेच दिसत नाही. आमचे सरकार आल्यावर सर्वच जातींचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करून विविध वर्गांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळेल, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. 

महाआघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे राहुल गांधी यांची शनिवारी महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा जनतेच्या प्रतिसादाने यशस्वी ठरली. गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात झालेल्या सभेत जनतेचा उत्साह ओसंडून वाहत होता. सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

धर्माच्या नावावर विभागले जाते - थोरातराज्याचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात ज्या वेळी लोकशाही, राज्यघटना आणि जनतेचा विचार अडचणीत आला त्या प्रत्येक वेळी विदर्भातील जनता भक्कमपणे पाठीशी उभी राहिली आहे. आज तीच वेळ आहे. मोदी सरकारने भेदाभेद करून धर्माच्या नावावर माणसांना विभागण्याचे काम केले. 

घोषणापत्रात सर्वांना न्याय - पटोलेकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, पक्षाने आणलेल्या घोषणापत्रात सर्वांना न्याय, जनतेची भागिदारीचे वचन दिले आहे. या देशातील जंगल, जल, जमिनीवर जनतेचा हक्क आहे, अदानींचा नाही. जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणाचा मुद्दा घेतल्याबद्दल त्यांनी जनतेच्या वतीने राहुल गांधी यांचे आभार मानले.

जनतेला वाचवा - पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मोदी सरकारने केलेल्या सर्व घोषणा जनतेची फसवणूक करणाऱ्या आहेत. या देशाने १० वर्षात घेतलेल्या अनुभवातून पुन्हा जुने दिवस आणले पाहिजे आणि भरडलेल्या जनतेला वाचविले पाहिजे ही भावना देशभर जागृत झाली आहे. मोदी सरकारच्या काळात देशात १ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज सरासरी ३० शेतकरी आत्महत्या करतात.  

भीती का वाटते? - वडेट्टीवारविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मोदी सरकार गरिबांचे नसून जुमलेबाज आणि लुटारूंचे आहे. सोन्यावर ३ टक्के, हिऱ्यावर २ टक्के जीएसटी लावणारे हे सरकार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर १८ टक्के जीएसटी लावत आहे. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’ म्हणत जनतेच्या मनात विश्वास पेरला. हा देश गांधींनीच बनविला आणि उभा केला. त्यामुळे आता गांधी नावाची भीती मोदींना वाटत आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडाराRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस