शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बेराेजगारी, महागाई, युवकांच्या प्रश्नांवर कधी बोलणार? राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 07:06 IST

राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल, साकोलीतील सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारला जोश

लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा: पंतप्रधान देशातील बेराेजगारी, महागाई, शेतकरी युवकांच्या प्रश्नांवर बाेलत नाहीत, त्याऐवजी धर्म, हिंदू-मुस्लीम जातीय तेढ वाढेल असेच बाेलतात, देशात ओबीसींची संख्या माेठी आहे, मात्र त्यांची भागीदारी कुठेच दिसत नाही. आमचे सरकार आल्यावर सर्वच जातींचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करून विविध वर्गांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळेल, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. 

महाआघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे राहुल गांधी यांची शनिवारी महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा जनतेच्या प्रतिसादाने यशस्वी ठरली. गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात झालेल्या सभेत जनतेचा उत्साह ओसंडून वाहत होता. सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

धर्माच्या नावावर विभागले जाते - थोरातराज्याचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात ज्या वेळी लोकशाही, राज्यघटना आणि जनतेचा विचार अडचणीत आला त्या प्रत्येक वेळी विदर्भातील जनता भक्कमपणे पाठीशी उभी राहिली आहे. आज तीच वेळ आहे. मोदी सरकारने भेदाभेद करून धर्माच्या नावावर माणसांना विभागण्याचे काम केले. 

घोषणापत्रात सर्वांना न्याय - पटोलेकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, पक्षाने आणलेल्या घोषणापत्रात सर्वांना न्याय, जनतेची भागिदारीचे वचन दिले आहे. या देशातील जंगल, जल, जमिनीवर जनतेचा हक्क आहे, अदानींचा नाही. जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणाचा मुद्दा घेतल्याबद्दल त्यांनी जनतेच्या वतीने राहुल गांधी यांचे आभार मानले.

जनतेला वाचवा - पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मोदी सरकारने केलेल्या सर्व घोषणा जनतेची फसवणूक करणाऱ्या आहेत. या देशाने १० वर्षात घेतलेल्या अनुभवातून पुन्हा जुने दिवस आणले पाहिजे आणि भरडलेल्या जनतेला वाचविले पाहिजे ही भावना देशभर जागृत झाली आहे. मोदी सरकारच्या काळात देशात १ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज सरासरी ३० शेतकरी आत्महत्या करतात.  

भीती का वाटते? - वडेट्टीवारविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मोदी सरकार गरिबांचे नसून जुमलेबाज आणि लुटारूंचे आहे. सोन्यावर ३ टक्के, हिऱ्यावर २ टक्के जीएसटी लावणारे हे सरकार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर १८ टक्के जीएसटी लावत आहे. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’ म्हणत जनतेच्या मनात विश्वास पेरला. हा देश गांधींनीच बनविला आणि उभा केला. त्यामुळे आता गांधी नावाची भीती मोदींना वाटत आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडाराRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस