शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

‘आम्हाला रोजगार केव्हा मिळणार’ गावागावांत झळकले फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

दयाल भोवते। लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : सण असो की उत्सव, नेत्याचा वाढदिवस असो की गावपुढाऱ्याकडील कार्यक्रम गावातील चौकात ...

ठळक मुद्देआगळीवेगळी शक्कल : बॅनरच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा भारतीय युवा बेराजगार संघटनेचा प्रयत्न

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : सण असो की उत्सव, नेत्याचा वाढदिवस असो की गावपुढाऱ्याकडील कार्यक्रम गावातील चौकात फलक लावण्याची स्पर्धा दिसून येते. प्रत्येक गावातील चौक अशा फलकांनी ‘सजलेले’ दिसतात. मात्र लाखांदूर तालुक्यातील गावागावांतील चौकात लागलेले फलक आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘आम्हाला रोजगार केव्हा मिळणार’ असे शिर्षक असलेले आणि बेरोजगार तरुणांचे छायाचित्र असलेले फलक सध्या चर्चेचा विषय झाले आहे. भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याची ही शक्कल लढविण्यात आली आहे.शहरी असो की ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या अलीकडे मोठ्या प्रमाणात तरुणांना भेडसावीत आहे. उच्च शिक्षण घेवून आणि स्पर्धा परीक्षांचा तासन्तास अभ्यास करुनही नोकरी लागत नाही. शासन मेघाभरतीचे आश्वासन देवून तरुणांची दिशाभूल करीत आहे. नोकरी नसल्याने अनेक तरुण बेरोजगारीची जीने जगत आहे. बेरोजगारीबाबत प्रत्येकजण शासनाच्या नावाने संताप व्यक्त करीत आहे. मात्र नोकऱ्याच मिळत नाही.आता या बेरोजगार तरुणांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभिनव शक्कल लढविली आहे. गावागावातील चौकांमध्ये फलक लावून आम्हाला रोजगार केव्हा मिळणार असा सवाल विचारला आहे. भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून लावलेले हे फलक आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गत काही वर्षात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. युवकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. शासनाच्या या नाकर्तेपणावर बोट ठेवत फलक लावून तरुणांनी वेगळे आंदोलनच उभारल्याचे दिसत आहे.भारतीय युवा बेरोजगार संस्थेचे अध्यक्ष बालु चुन्ने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले सर्वत्र बेरोजगारी दिसत आहे. बेरोजगारीमुळे तरुणांचे लग्नही जुळत नाही. उच्च शिक्षण घेतल्याने शेतीत काम करायलाही कुणी पुढे येत नाही. आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण होत नसल्याने तरुण निराशेत जात आहेत. अशा तरुणांच्या भावनेला वाचा फोडण्यासाठी आपण पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. लाखांदूर तालुक्यातील खोलमारा, दिघोरी, विरली बुज. यासह विविध गावात दर्शनी भागात लावलेले फलक तरुणांच्या व्यथा मांडत आहेत.शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेधलाखांदूर तालुक्यातील तरुणांनी गावागावांत फलक लावून रोजगाराबाबत शासनाचा उदासीन धोरणाचा एकप्रकारे निषेधच केला आहे. बेरोजगारांना रोजगार आणि नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु गत पाच वर्षात तरुणांना नोकºया मिळाल्या नाही. उलट खाजगी आस्थापनातून मंदीच्या नावाखाली त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. मेगा भरतीतूनही बेरोजगारांच्या हाती काही लागले नाही. शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारांची विदारक परिस्थिती आहे. अशा तरुणांनी आता फलकांच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार आम्हाला नोकरी कधी देणार असा सवाल करीत भारतीय युवा बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून लाखांदूर तालुक्यातील तरुण एकत्र येत शासनाचा धोरणाचा निषेध करीत आहेत.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी