शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

‘आम्हाला रोजगार केव्हा मिळणार’ गावागावांत झळकले फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

दयाल भोवते। लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : सण असो की उत्सव, नेत्याचा वाढदिवस असो की गावपुढाऱ्याकडील कार्यक्रम गावातील चौकात ...

ठळक मुद्देआगळीवेगळी शक्कल : बॅनरच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा भारतीय युवा बेराजगार संघटनेचा प्रयत्न

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : सण असो की उत्सव, नेत्याचा वाढदिवस असो की गावपुढाऱ्याकडील कार्यक्रम गावातील चौकात फलक लावण्याची स्पर्धा दिसून येते. प्रत्येक गावातील चौक अशा फलकांनी ‘सजलेले’ दिसतात. मात्र लाखांदूर तालुक्यातील गावागावांतील चौकात लागलेले फलक आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘आम्हाला रोजगार केव्हा मिळणार’ असे शिर्षक असलेले आणि बेरोजगार तरुणांचे छायाचित्र असलेले फलक सध्या चर्चेचा विषय झाले आहे. भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याची ही शक्कल लढविण्यात आली आहे.शहरी असो की ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या अलीकडे मोठ्या प्रमाणात तरुणांना भेडसावीत आहे. उच्च शिक्षण घेवून आणि स्पर्धा परीक्षांचा तासन्तास अभ्यास करुनही नोकरी लागत नाही. शासन मेघाभरतीचे आश्वासन देवून तरुणांची दिशाभूल करीत आहे. नोकरी नसल्याने अनेक तरुण बेरोजगारीची जीने जगत आहे. बेरोजगारीबाबत प्रत्येकजण शासनाच्या नावाने संताप व्यक्त करीत आहे. मात्र नोकऱ्याच मिळत नाही.आता या बेरोजगार तरुणांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभिनव शक्कल लढविली आहे. गावागावातील चौकांमध्ये फलक लावून आम्हाला रोजगार केव्हा मिळणार असा सवाल विचारला आहे. भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून लावलेले हे फलक आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गत काही वर्षात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. युवकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. शासनाच्या या नाकर्तेपणावर बोट ठेवत फलक लावून तरुणांनी वेगळे आंदोलनच उभारल्याचे दिसत आहे.भारतीय युवा बेरोजगार संस्थेचे अध्यक्ष बालु चुन्ने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले सर्वत्र बेरोजगारी दिसत आहे. बेरोजगारीमुळे तरुणांचे लग्नही जुळत नाही. उच्च शिक्षण घेतल्याने शेतीत काम करायलाही कुणी पुढे येत नाही. आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण होत नसल्याने तरुण निराशेत जात आहेत. अशा तरुणांच्या भावनेला वाचा फोडण्यासाठी आपण पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. लाखांदूर तालुक्यातील खोलमारा, दिघोरी, विरली बुज. यासह विविध गावात दर्शनी भागात लावलेले फलक तरुणांच्या व्यथा मांडत आहेत.शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेधलाखांदूर तालुक्यातील तरुणांनी गावागावांत फलक लावून रोजगाराबाबत शासनाचा उदासीन धोरणाचा एकप्रकारे निषेधच केला आहे. बेरोजगारांना रोजगार आणि नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु गत पाच वर्षात तरुणांना नोकºया मिळाल्या नाही. उलट खाजगी आस्थापनातून मंदीच्या नावाखाली त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. मेगा भरतीतूनही बेरोजगारांच्या हाती काही लागले नाही. शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारांची विदारक परिस्थिती आहे. अशा तरुणांनी आता फलकांच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार आम्हाला नोकरी कधी देणार असा सवाल करीत भारतीय युवा बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून लाखांदूर तालुक्यातील तरुण एकत्र येत शासनाचा धोरणाचा निषेध करीत आहेत.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी