शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

डाव्या कालव्यात पाणी केव्हा सोडणार?

By admin | Updated: November 10, 2014 22:39 IST

शेतकऱ्यांचे धानासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना डावा कालवा, गोसे खुर्द प्रकल्प विभागाचे अभियंता याकडे दुर्लक्ष करीत डाव्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले. त्यामुळे १३० दिवसाचे

कोंढा (कोसरा) : शेतकऱ्यांचे धानासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना डावा कालवा, गोसे खुर्द प्रकल्प विभागाचे अभियंता याकडे दुर्लक्ष करीत डाव्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले. त्यामुळे १३० दिवसाचे धान वाचविण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत करीत आहेत. पाण्याअभावी भारी धान धोक्यात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.गोसे खुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात यावर्षी प्रथमच डावा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने कोंढा कोसरा, सोमनाळा, भावड, सेंद्री, आकोट, चिचाळ, खैरी अशा अनेक गावच्या शेतकऱ्यांनी इंजिनद्वारे शेतीला पाणी दिले. त्यामुळे चौरास भागात कोरडवाहू जमिनीला पाणी मिळाल्याने शेकडो हेक्टर जमिनीत धान पिक घेता आले. कोरडवाहू शेतीला पाणी न मिळाल्याने अनेक शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहेत. हलक्या प्रतीचे धान निघाले, पण अजून १३०, १३५ दिवसाचे जयश्रीराम, केसर, क्रांती धान निघण्यास वेळ आहे. अशावेळी या धान पिकाला पाण्याची गरज असताना धरण विभाग, डावा कालवा, वाही यांनी डाव्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकरी भारी धानपीक जगविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करीत आहेत. कालव्याच्या खड्ड्यात साचलेले पाणी इंजीनद्वारे देताना दिसत आहे. तीन महिन्यापासून कोंढा परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने मोठा दुष्काळ पडला आहे. डाव्या कालव्यामुळे कालव्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना धानपिकास संजीवनी मिळाली. अशावेळी एकवेळा पुन्हा भारी धानासाठी डाव्या कालव्यात सोमनाळा गेटपर्यंत पाणी सोडणे आवश्यक आहे. या संबंधात वाही येथील अभियंताची शेतकऱ्यांनी भेट घेऊ न एकदा पाणी सोडण्याची विनंती केली तेव्हा पाणी सोडण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.पूर्व विदर्भात वरदान ठरणारा गोसे प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. डावा कालव्यात बाराही महिणे पाणी सोडणे आवश्यक आहे. पण कालव्याच्या साईडचे फ्लोरिंगचे काम रखडले असल्याने बाराही महिने पाणी सोडणे अशक्य आहे. तरी रखडले काम त्वरीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या एकदा डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)