शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

डाव्या कालव्यात पाणी केव्हा सोडणार?

By admin | Updated: November 10, 2014 22:39 IST

शेतकऱ्यांचे धानासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना डावा कालवा, गोसे खुर्द प्रकल्प विभागाचे अभियंता याकडे दुर्लक्ष करीत डाव्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले. त्यामुळे १३० दिवसाचे

कोंढा (कोसरा) : शेतकऱ्यांचे धानासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना डावा कालवा, गोसे खुर्द प्रकल्प विभागाचे अभियंता याकडे दुर्लक्ष करीत डाव्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले. त्यामुळे १३० दिवसाचे धान वाचविण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत करीत आहेत. पाण्याअभावी भारी धान धोक्यात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.गोसे खुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात यावर्षी प्रथमच डावा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने कोंढा कोसरा, सोमनाळा, भावड, सेंद्री, आकोट, चिचाळ, खैरी अशा अनेक गावच्या शेतकऱ्यांनी इंजिनद्वारे शेतीला पाणी दिले. त्यामुळे चौरास भागात कोरडवाहू जमिनीला पाणी मिळाल्याने शेकडो हेक्टर जमिनीत धान पिक घेता आले. कोरडवाहू शेतीला पाणी न मिळाल्याने अनेक शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहेत. हलक्या प्रतीचे धान निघाले, पण अजून १३०, १३५ दिवसाचे जयश्रीराम, केसर, क्रांती धान निघण्यास वेळ आहे. अशावेळी या धान पिकाला पाण्याची गरज असताना धरण विभाग, डावा कालवा, वाही यांनी डाव्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकरी भारी धानपीक जगविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करीत आहेत. कालव्याच्या खड्ड्यात साचलेले पाणी इंजीनद्वारे देताना दिसत आहे. तीन महिन्यापासून कोंढा परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने मोठा दुष्काळ पडला आहे. डाव्या कालव्यामुळे कालव्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना धानपिकास संजीवनी मिळाली. अशावेळी एकवेळा पुन्हा भारी धानासाठी डाव्या कालव्यात सोमनाळा गेटपर्यंत पाणी सोडणे आवश्यक आहे. या संबंधात वाही येथील अभियंताची शेतकऱ्यांनी भेट घेऊ न एकदा पाणी सोडण्याची विनंती केली तेव्हा पाणी सोडण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.पूर्व विदर्भात वरदान ठरणारा गोसे प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. डावा कालव्यात बाराही महिणे पाणी सोडणे आवश्यक आहे. पण कालव्याच्या साईडचे फ्लोरिंगचे काम रखडले असल्याने बाराही महिने पाणी सोडणे अशक्य आहे. तरी रखडले काम त्वरीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या एकदा डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)