शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

उन्हाळी धानाचे चुकारे केव्हा मिळणार?

By admin | Updated: July 4, 2016 00:24 IST

उन्हाळी धानपिकाची खरेदी केल्यानंतर चार दिवसात चुकारे देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

विलास श्रुंगारपवार : व्याजाचा नाहक भुर्दंड बसणारभंडारा : उन्हाळी धानपिकाची खरेदी केल्यानंतर चार दिवसात चुकारे देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. हे सरकार केवळ पोकळ आश्वासन देणारे सरकार असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विलासराव श्रुंगारपवार यांनी केला आहे.मागीलवर्षी खरीपाच्या हंगामातील धानपीक शेतकऱ्यांच्या हातात आले. त्यावेळी आधारभूत धान खरेदी केंद्र विलंबाने सुरू करण्यात आले. त्यामुळे कर्जात असलेल्या शेतकऱ्यांना धानपीक कमी दरात व्यापाऱ्यांना विकावे लागले. आधारभूत केंद्र सुरू झाले तोपर्यंत शेतकऱ्यांचे धानपीक विकून झाले होते. त्यामुळे त्यांना बोनस मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी नागविला गेला. या कठिण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. पीक आल्यानंतर ते विकण्यासाठी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. खरेदीच्या चार दिवसातच चुकारे देऊ, असे सरकारने सांगितले होते. परंतु अद्याप चुकारे देण्यात आले नाही. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन धान लागवड केली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत ३० जूनपर्यंत पीक कर्जाचे पैसे भरावे लागतात तर जिल्हा बँकेत ३१ मार्च ही कर्ज भरण्याची शेवटची तारीख असते. शेतकऱ्यांना वेळेत चुकारे न दिल्यामुळे ते पैसे कसे भरतील? त्यांच्यावर व्याजाचा नाहक भुर्दंड पडेल त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही श्रुंगारपवार यांनी उपस्थित केला. (जिल्हा प्रतिनिधी)