शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

उन्हाळी धानाचे चुकारे केव्हा मिळणार?

By admin | Updated: July 4, 2016 00:24 IST

उन्हाळी धानपिकाची खरेदी केल्यानंतर चार दिवसात चुकारे देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

विलास श्रुंगारपवार : व्याजाचा नाहक भुर्दंड बसणारभंडारा : उन्हाळी धानपिकाची खरेदी केल्यानंतर चार दिवसात चुकारे देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. हे सरकार केवळ पोकळ आश्वासन देणारे सरकार असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विलासराव श्रुंगारपवार यांनी केला आहे.मागीलवर्षी खरीपाच्या हंगामातील धानपीक शेतकऱ्यांच्या हातात आले. त्यावेळी आधारभूत धान खरेदी केंद्र विलंबाने सुरू करण्यात आले. त्यामुळे कर्जात असलेल्या शेतकऱ्यांना धानपीक कमी दरात व्यापाऱ्यांना विकावे लागले. आधारभूत केंद्र सुरू झाले तोपर्यंत शेतकऱ्यांचे धानपीक विकून झाले होते. त्यामुळे त्यांना बोनस मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी नागविला गेला. या कठिण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. पीक आल्यानंतर ते विकण्यासाठी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. खरेदीच्या चार दिवसातच चुकारे देऊ, असे सरकारने सांगितले होते. परंतु अद्याप चुकारे देण्यात आले नाही. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन धान लागवड केली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत ३० जूनपर्यंत पीक कर्जाचे पैसे भरावे लागतात तर जिल्हा बँकेत ३१ मार्च ही कर्ज भरण्याची शेवटची तारीख असते. शेतकऱ्यांना वेळेत चुकारे न दिल्यामुळे ते पैसे कसे भरतील? त्यांच्यावर व्याजाचा नाहक भुर्दंड पडेल त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही श्रुंगारपवार यांनी उपस्थित केला. (जिल्हा प्रतिनिधी)