शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:42 IST

बारव्हा : कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद करण्यात आलेल्या शाळा पुढे संक्रमण कमी झाल्यानंतरही काही सबबी सांगून दीड वर्षापासून ...

बारव्हा : कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद करण्यात आलेल्या शाळा पुढे संक्रमण कमी झाल्यानंतरही काही सबबी सांगून दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. काहींचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. मात्र गरिबांच्या मुलांना ही सुविधाही मिळाली नाही. घरी राहून विद्यार्थ्यांसह पालक वैतागले आहेत. आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळे राज्य सरकार शाळा सुरू करण्याचा निर्णय कधी घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाही झाल्या नाहीत. त्यानंतर जून-२०२१ पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. परंतु शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या नाहीत. जुलैमध्ये शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच १७ ऑगस्टपासून इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. टास्क फोर्सच्या इशाऱ्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यातच दिवाळीनंतर या शाळा सुरू होण्याचे संकेत राज्य शासनाने दिले होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर लग्न, हॉटेल, बार, दुकाने, मॉल, बस, रेल्वे यासह इतर बाबींना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे उदासीन धोरण असल्याचा आरोप काही शिक्षणतज्ज्ज्ञांनी केला आहे. प्रशासन व तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. टास्क फोर्समधील तज्ज्ञांचा शाळा सुरू करण्याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शाळा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

बॉक्स

बालमनावर विपरीत परिणाम

शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकर ठोस निर्णय घेत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा नसल्याने ऑनलाईनच्या नावावर शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये शालेय विद्याथ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याची माहिती काही शिक्षकांनी दिली असून, याला पालकांसह डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे. मुलांच्या वर्तनात बदल जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षणातील रुची कमी

मुले घरी असल्याने ती पालकांसोबत रोज गर्दीत जात आहेत. काही शेतातील कामे करतात तर काही गटागटाने खेळत असतात. यात त्यांना मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह अन्य उपाययोजनांचे भान नसते. त्यांचा संपूर्ण वेळ खेळण्यात जात असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांची शिक्षणातील रुची कमी होत असल्याचेही पालकांनी सांगितले, याबाबत शिक्षकांच्या संघटना आक्रमक भूमिका न घेता गप्प असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे.

कोट

कोरोना संक्रमण कमी झाले की निर्बंध उठविले जातात. वाढले की करण्याबाबत शासनाचे उदासीन धोरण पुन्हा लावले जातात. हाच निकष शाळेला लावून शाळा सुरू कराव्यात.

- महादेव खटके, शिक्षक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारव्हा.

शाळा बंद असल्याने मुले आमच्यासोबत लान, बारसे, बाजार, इतर घरगुती कार्यक्रमात येतात. आम्ही दिवसभर शेतात असतो, तेव्हा मुले घोळक्याने गावात खेळतात. शाळा सुरू झाल्या तर ते शाळेत सुरक्षित राहतील व शिक्षणही होईल. त्यामुळे सरकारने लवकर शाळा सुरू कराव्यात.

रवी झोडे, पालक