शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

शेतकºयांच्या संवेदना सरकारला केव्हा कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:22 IST

जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३० टक्के पाऊस बरसला.

ठळक मुद्देनाना पटोले : दुष्काळीस्थितीवर तोडगा काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३० टक्के पाऊस बरसला. पावसाने दगा दिल्यामुळे शेतकºयांवर संकट ओढवले असून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज असताना आठ तास वीज पुरवठा करून शेतकºयांना वेठीस धरल्या जात आहे. त्यामुळे सरकारला शेतकºयांच्या संवेदना कळणार की नाही असा प्रश्न खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.राज्यात अतिरिक्त वीज असल्यामुळे वीज निर्मितीसाठी नवीन प्रकल्पाची गरज नसल्याचे विधान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केले. त्यावर खा.पटोले म्हणाले, अतिरिक्त वीज आहे तर शेतकºयांना २४ तास वीज मिळाली पाहिजे. आठ तास वीज का देता? छत्तीसगडच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे दर जास्त आहे. राज्यात पवन ऊर्जा, जल विद्युत आणि सौर ऊर्जा निर्मितीसाठी अनेक संधी आहेत.या माध्यमातून वीज निर्मिती झाल्यास त्याचा शेतकºयांना लाभ मिळू शकतो, असेही खा.नाना पटोले म्हणाले. पत्रपरिषदेला नगरसेवक नितीन धकाते, मंगेश वंजारी, संजय मते उपस्थित होते.ऊर्जामंत्र्यांचे विधान जखमेवर मीठ चोळणारेशेतकरी दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झाला असताना आठ तासांच्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकºयांना नानाविध अडचणींना सामोरे जावे लागते आहे. असे असताना ऊर्जामंत्री राज्यात अतिरिक्त वीज असल्याचे सांगत आहे. ऊर्जामंत्र्यांचे सभागृहातील हे विधान शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याचा आरोपही त्यांनी केला.सरसकट कर्जमाफीची गरजराज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रस्ताव आॅनलाईनने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्व्हरच्या धीम्या गतीमुळे शेतकºयांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. या कर्जाचा लाभ मिळविण्यासाठी शेतकºयांची पायपीट सुरू आहे.मासेमारीचा जीआर जाचकराज्य शासनाने गोड्या तलावात मासेमारी करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयात ८० टक्के लीज वाढविली आहे. या निर्णयाने मासेमार बांधवांवर संकट ओढवणार आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात तलावांची लिज माफ करा आणि तलावाची दुरूस्ती करा, असे म्हटले आहे. हा शासन निर्णय बदलविण्यात न आल्यास मासेमार बांधवांसाठी संघर्ष करणार इशारा दिला आहे. त्यानंतरही सरकारने दुरूस्ती केली नाही तर जीआरची होळी करणार असल्याचे पत्रात म्हटल्याचे खा.पटोले यांनी सांगितले.