शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

गोसेखुर्द बाधितांना वाढीव कुटुंबाचा लाभ केव्हा मिळणार?

By admin | Updated: May 30, 2016 00:58 IST

जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे कुणी प्रकल्पग्रस्तांचा तारणहार होवून न्याय देईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक कुटुंब वंचित : यंत्रणेला कायद्याचा विसरपुरुषोत्तम डोमळे सानगडीजिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे कुणी प्रकल्पग्रस्तांचा तारणहार होवून न्याय देईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकतंत्र राज्य व्यवस्थेत अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी प्रकल्पग्रस्त अनेक संघटनांच्या माध्यमातून लढतच आहेत. परंतु त्यांच्या पदरी निराशाच हाती लागत आहे. मात्र जिल्ह्यातील विकासाचे महामेरू म्हणवणारे लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांचे कैवारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या ज्वलंत समस्या उचलून धरले तर प्रकल्पग्रस्तांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. परंतु एकही पुढाऱ्याने आजतागायत प्रकल्पग्रस्तांची साधी भेट सुद्धा घेतली नाही. त्यामुये अनेक प्रकल्पग्रस्त कुटुंबांमध्ये शासनाप्रती रोष खदखदत आहे.विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द (इंदिरा सागर) प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १,१९९.६० कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले होते. या पॅकेजनुसार प्रकल्पबाधीत १८ हजार ४४४ कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुश्त रक्कम देण्याचे शासनाने निश्चित केले होते. यापैकी भंडारा व नागपूर जिल्ह्यातील ११ हजार १२९ कुटुंबांपैकी ७ हजार २७१ कुटुंबांना लाभ देण्यात आला. वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकरकमी मोबदला देण्याचे अध्यादेश राज्य शासनाने निर्गमीत केले आहे. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांनी डिसेंबर २०१५ ला वाढीव कुटुंबांना नोकरीऐवजी एकमुश्त रक्कम मिळण्याबाबत पूनर्वसन अधिकारी भंडारा यांचेकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु आजपर्यंत भीजत घोंगडे आहे. याला भंडाऱ्याचे पुनर्वसन अधिकारी कारणीभूत आहेत कायदा निर्माण करणाऱ्या यंत्रणेलाच कायद्याचा विसर झाल्यामुळे अनेक वाढीव कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. कारण कायदा पुस्तकात आणि पुस्तक आलमारीत असल्यामुळे अंमलबजावणी शून्य आहे.