शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द बाधितांना वाढीव कुटुंबाचा लाभ केव्हा मिळणार?

By admin | Updated: May 30, 2016 00:58 IST

जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे कुणी प्रकल्पग्रस्तांचा तारणहार होवून न्याय देईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक कुटुंब वंचित : यंत्रणेला कायद्याचा विसरपुरुषोत्तम डोमळे सानगडीजिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे कुणी प्रकल्पग्रस्तांचा तारणहार होवून न्याय देईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकतंत्र राज्य व्यवस्थेत अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी प्रकल्पग्रस्त अनेक संघटनांच्या माध्यमातून लढतच आहेत. परंतु त्यांच्या पदरी निराशाच हाती लागत आहे. मात्र जिल्ह्यातील विकासाचे महामेरू म्हणवणारे लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांचे कैवारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या ज्वलंत समस्या उचलून धरले तर प्रकल्पग्रस्तांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. परंतु एकही पुढाऱ्याने आजतागायत प्रकल्पग्रस्तांची साधी भेट सुद्धा घेतली नाही. त्यामुये अनेक प्रकल्पग्रस्त कुटुंबांमध्ये शासनाप्रती रोष खदखदत आहे.विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द (इंदिरा सागर) प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १,१९९.६० कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले होते. या पॅकेजनुसार प्रकल्पबाधीत १८ हजार ४४४ कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुश्त रक्कम देण्याचे शासनाने निश्चित केले होते. यापैकी भंडारा व नागपूर जिल्ह्यातील ११ हजार १२९ कुटुंबांपैकी ७ हजार २७१ कुटुंबांना लाभ देण्यात आला. वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकरकमी मोबदला देण्याचे अध्यादेश राज्य शासनाने निर्गमीत केले आहे. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांनी डिसेंबर २०१५ ला वाढीव कुटुंबांना नोकरीऐवजी एकमुश्त रक्कम मिळण्याबाबत पूनर्वसन अधिकारी भंडारा यांचेकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु आजपर्यंत भीजत घोंगडे आहे. याला भंडाऱ्याचे पुनर्वसन अधिकारी कारणीभूत आहेत कायदा निर्माण करणाऱ्या यंत्रणेलाच कायद्याचा विसर झाल्यामुळे अनेक वाढीव कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. कारण कायदा पुस्तकात आणि पुस्तक आलमारीत असल्यामुळे अंमलबजावणी शून्य आहे.