शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शासकीय कार्यालयांना हक्काची जागा कधी ? अनेक कार्यालये भाड्याच्या जागेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:10 IST

शासकीय कार्यालये आहेत भाड्याच्या जागेत : स्वतंत्र जागेची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरातील अनेक शासकीय कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. या कार्यालयांना अद्यापही हक्काची जागा मिळाली नसल्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचे भाडे द्यावे लागत आहे.

शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद यासह महत्त्वाच्या कार्यालयांच्या इमारती आहेत. मात्र, असे असले तरी अद्यापही काही शासकीय कार्यालयांचा कारभार भाड्याच्या जागेतून चालतो. दुसरीकडे शासनाची अनेक कार्यालये नवीन जागेत स्थलांतरित झाल्यामुळे जुन्या इमारती धूळखात पडून आहेत. तर काही शासकीय कार्यालयांना अद्यापही हक्काची जागाच उपलब्ध न झाल्यामुळे अशा कार्यालयांचा कारभार भाड्याच्या जागेतून चालत असून, या कार्यालयांना स्वतंत्र जागेची गरज व्यक्त होत आहे.

ही कार्यालये भाड्याच्या जागेत

  • सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय
  • जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय
  • जिल्हा कामगार कार्यालय
  • अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय
  • जिल्हा प्रदूषण अधिकारी कार्यालय
  • जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय
  • बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय
  • जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालय

शासकीय कार्यालयांना हवी हक्काची जागाजी शासकीय कार्यालये भाड्याच्या जागेत चालतात, अशा कार्यालयांना अपुऱ्या जागेचा प्रश्न आहे. जागेअभावी कामकाज करतानादेखील अनेक समस्या उद्भवतात तरी शासकीय कार्यालयांना हक्काची द्यावी, अशी मागणी आहे.

दरवर्षी लाखांवर खर्च१९६० मध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर भंडारा राज्याचा जिल्हा म्हणून विकसित झाला. पूर्वीच्या भंडारा जिल्ह्याचे १ मे १९९९ रोजी विभाजन करण्यात आले आणि गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांना हक्काची जागाच मिळाली नाही.  काही महत्त्वाची कार्यालये आजही भाड्याच्या जागेतच चालतात. यासाठी लाखो रुपयाचा भुर्दंड सोसावा लागतो.

थकबाकीचा भार !जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालय हक्काची जागा नसल्यामुळे भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. यासाठी त्यांना भाडे द्यावे लागते, शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे काही कार्यालयाचे भाडे थकीत राहत असल्याची स्थिती आहे.

ज्या-ज्या विभागांची कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. त्या- त्या विभागांकडून याबाबत आढावा घेतला जात आहे. लवकरच या अनुषंगाने बैठक घेऊन जागेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. तसा पाठपुरावा केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. 

टॅग्स :Governmentसरकारbhandara-acभंडारा