शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

प्रकल्पग्रस्तांच्या वेदना संपणार तरी केव्हा?

By admin | Updated: April 22, 2017 00:35 IST

राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द (इंदिरासागर) धरणाचे काम पुर्णत्वाला आले असले तरी उजवा व डावा

पुनर्वसन हाच मुख्य अडसर : आता ‘एनबीसीसी’ करणार उजवा कालवा व नेरला उपसा सिंचन योजनेचे काम नंदू परसावार  भंडारा राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द (इंदिरासागर) धरणाचे काम पुर्णत्वाला आले असले तरी उजवा व डावा कालवा दुरूस्तीची कामे, उपसा सिंचन योजनेची कामे आजही अपूर्णावस्थेत आहेत. शेतकऱ्यांना सुजलाम्-सुफलाम् करण्याचे स्वप्न दाखवून १९८८ मध्ये पायाभरणी करण्यात आलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाला शनिवारला २९ वर्षे पूर्ण होत आहेत. या २९ वर्षात धरणाची उंची वाढली, विस्तार वाढला आणि किंमतही ५० पटीने वाढली, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या वेदना आजही कायम आहेत. २२ एप्रिल १९८८ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्याहस्ते पायाभरणी झालेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत ३७२.८५ कोटी इतकी होती. तिसऱ्या सुधारीत दरसूचीनुसार या प्रकल्पाची किंमत १८,४९४.५७ इतकी वाढली आहे. मार्च २०१७ पर्यंत ९,३००.५८ कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे. इतका खर्च होऊन केवळ ४९ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली. मागीलवर्षीचे ७२० आणि यावर्षीचे ७५० असे १,४७० कोटी रूपयांचे यावर्षीचे बजेट आहे. आता या प्रकल्पाचे काम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. २००९ मध्ये गोसेखुर्द प्रकल्पाला तत्कालीन केंद्र सरकारने ‘एआयबीपी’ (एक्सिलेरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम) अंतर्गत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली. त्यानुसार या प्रकल्पाला केंद्राकडून ९० टक्के तर राज्याकडून १० टक्के अर्थसहाय्य देण्याचे ठरविण्यात आले होते. या धरणाचे पाणी शेतापर्यंत पोहचविण्यासाठी उजवा व डावा असे दोन्ही मुख्य कालवे बांधण्यात आले आहे. या कालव्यापासून तयार करण्यात आलेले लघु कालवे व वितरिकांचे कामे अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अडचणी येत आहेत. डावा कालव्यातंर्गत ३१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून मागीलवर्षी ६,६८० हेक्टर क्षेत्र सिंचित झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. या प्रकल्पाच्या बुडीतक्षेत्रात ३४ गावे पूर्णत: तर ७० गावे अंशत: बाधित झाले आहेत. पूर्णत: बाधित ३४ गावांपैकी २८ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. यापैकी नेरला, खापरी (रेहपाडे), भंडारा (नझुल), सालेबर्डी, पिंडकेपार आणि करचखेडा या गावांचे पुनर्वसनाचे काम शिल्लक आहे. त्यापैकी सालेबर्डी, पिंडकेपार आणि करचखेडा या गावासाठी भूसंपादन करण्यात आले असून ले-आऊट मंजूर झाल्याचे कार्यकारी अभियंता अनिल खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भंडारा जिल्ह्याच्या सिमेपर्यंत ३० कि़मी.चा उजवा कालवा तयार आहे. परंतु कालव्याचे पाणी शेतापर्यंत जाण्यासाठी बांधलेले लघू कालवे व वितरिका अपूर्णावस्थेत असून सदोष बांधकामाचा फटका शेतकऱ्यांना बसला. नेरला उपसा सिंचन योजनेचे काम आॅगस्ट २०१६ मध्ये सुरू झाले असून ऊर्वरित कामे तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मागीलवर्षी ३,५०० हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले असले तरी शाश्वत सिंचनाचा लाभ मात्र शेतकऱ्यांना झालेला नाही.