शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
7
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
8
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
9
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
10
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
11
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
12
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
13
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
14
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
15
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
16
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
17
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
18
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
19
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
20
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार

उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना काम मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात हवा तेवढा वाव नाही. त्यातही भंडारा जिल्ह्यातील अनेक बेरोजगार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात हवा तेवढा वाव नाही. त्यातही भंडारा जिल्ह्यातील अनेक बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगारही गेले आहेत. उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना काम मिळेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. संचारबंदीचा परिणाम स्वरूपात जाणवण्याची धास्ती उद्योजक व कामगारांमध्ये व्याप्त आहे.

कोरोना महामारीने पुन्हा एकदा उद्योगजगतावर मंदीचे सावट आणले आहे. यामुळे कामगारांना आपली नोकरी जाण्याची तर उद्योजकांना कामगार गावी परत जाण्याची भीती सतावू लागली आहे. जिल्ह्यात हातावर मोजण्याइतपतच उद्योग आहेत. त्यातही अन्य गावांतून किंवा परप्रांतातून आलेले मजूर परत जातील याबाबत चिंता व्यक्त होत आहे. कामगारांना नोकरीची चातकासारखी प्रतीक्षा करावी लागत असते. लॉकडाऊन उघडल्यानंतर कामगार आपापल्या उद्योगधंद्यात कामावर परत आले होते. राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली, ती आजही कायम आहे. लॉकडाऊननंतर नोकरी मिळायला त्रास झाला. आता पुन्हा संचारबंदीत कामगारांनी चटणी-भाकर खाऊन दिवस काढले. आता स्थिती सुधारणार की नाही, असा प्रश्न कामगार विचारत आहेत.

कच्चा माल मिळण्यात अडचणी

कोरोनामुळे संचारबंदी लावण्याची वेळ आली. अनेक उत्पादक कंपन्या बंद करण्यात आल्या. काही ठिकाणी कमी मॅनपाॅवरमध्ये कामे काढली जात आहेत. भंडारा जिल्ह्यात औद्योगिक वसाहती आणि कंपन्याही कमी आहेत. त्यातही कच्च्या मालाची वाहतूक होणे म्हणजे जिकिरीची बाब आहे. तेल कंपन्यांना कच्चा माल मिळणे दुरापास्त झाला आहे. यंत्रांचे लहान-मोठे सुटे भाग नादुरुस्त झाल्यास ते मागविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. गतवर्षी जनता कर्फ्यूनंतर कारखान्यांतील कामगार व मजूर पायीच गावाकडे निघाले होते. त्यापैकी काहींना आजही काम मिळाले नाही.

गतवर्षीच्या आठवणी कायम आहेत. रोजगार गेल्यानंतर काय परिस्थिती असते, याची कल्पना न केलेली बरी; पण आता महिनाभरापासून हाताला काम नाही तर दामही मिळणार नाही. आता इथे राहून काय करणार, असा सवाल आहे.

-प्रेमदास रंगारी, कामगार, भंडारा

हाताला काम मिळेल किंवा नाही याची शाश्वती नाही. गरिबीत अनेक दिवस काढले. गतवर्षी सहा महिने हाताला काम मिळाले नाही. अनेक अडचणींना सामना करावा लागला. संचारबंदीमुळे हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?

-मुकेश साकुरे, कामगार, भंडारा

कोरोना काळात अनेक लहान-मोठे उद्योग बंद झाले. उद्योगजगताची गाडी हळूहळू रुळावर आली होती. संचारबंदीत साहित्याचा पुरवठा वेळेवर होत नाही.

येत्या काही दिवसांत स्थिती सामान्य झाली नाही तर टेन्शनमध्ये वाढ होणार, यात शंका नाही.

- डिम्पल मल्होत्रा, उद्योजक व डिस्ट्रिब्युटर कन्झ्युमर प्रॉडक्ट

राज्य शासनाने संचारबंदीचा निर्णय घेतलेला आहे. कामगार घरी परततात. कंपन्यांना माणसं मिळत नाहीत. कच्चा माल वेळेवर मिळत नाही. स्थिती अशी उद्‌भवते की कामगारांना काम मिळत नाही. स्थिती सामान्य व्हायलाच हवी, यात कामगार व उद्योजक दोघांचे हित आहे.

-नितीन दुरगकर, उद्योजक, भंडारा

अनेक ठिकाणी कामगार कमी-जास्त प्रमाणात आपापल्या उद्योग क्षेत्रात परतले होते. गाडी पुन्हा रुळावर आली होती. उद्याेगांचे चाक मंदावले आहे. कामगारांना काम मिळणे आवश्यक आहे. संचारबंदीमुळे कामगारांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते. आर्थिक फटकाही बसतो.

-जयंत गज्जर, उद्योजक, भंडारा